शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

अलीकडच्या काळात वकिली क्षेत्राचे रुपांतर व्यवसायाकडून व्यापाराकडे- न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 12:59 IST

पुणे : समाजातील असंख्य दुर्बल लोकांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने कायदेशीर सल्ला केंद्रासारखे उपक्रम राबविले तरी लोक तिथे पोहोचू शकत ...

पुणे : समाजातील असंख्य दुर्बल लोकांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने कायदेशीर सल्ला केंद्रासारखे उपक्रम राबविले तरी लोक तिथे पोहोचू शकत नाहीत. उपेक्षित आणि वंचित लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने न्यायाच्या प्रक्रियेत जनहित याचिका आणि लोकअदालत यांना म्हणूनच आगळे महत्त्व आहे. न्यायालयात जाऊनच न्याय मिळतो, असे नाही. तर, सामाजिक प्रक्रियेतूनही प्रश्न सुटू शकतात. मध्यस्थ म्हणून कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) शताब्दीनिमित्त आयोजित ‘देशात मध्यस्थाचे भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. इंडियन लॉ सोसायटीज सेंटर फॉर आर्बिट्रेशन ॲण्ड मिडिएशनचे (इल्स्का) उद्घाटन चंद्रचूड यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर, उपाध्यक्ष पी. व्ही. करंदीकर, प्राचार्य वैजयंती जोशी, संचालक सत्या नारायण उपस्थित होते.

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये ४ कोटी, उच्च न्यायालयांमध्ये १ कोटी आणि सर्वोच्च न्यायालयात ७२ हजार खटले प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या नेहमीच्या प्रक्रियेतून हे खटले लवकर मार्गी लागणे अशक्य आहे, असे सांगून ते म्हणाले, आपला समाज विषम असल्याने त्यांच्याकडील साधनेही विषम आहेत. मालक आणि कामगार, घरमालक आणि भाडेकरू किंवा अगदी पती-पत्नी यांच्यातील एक पक्ष अशक्त ठरू शकतो. व्यावसायिक भागीदार आणि पती-पत्नी यांच्यात विसंवाद होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अशावेळी मध्यस्थ गरजेचा आहे. तसेच न्यायालयीन मध्यस्थाची भूमिका वठवताना आपली कृती राज्य घटनेशी सुसंगत असली पाहिजे. घटनाबाह्य वर्तन घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

अलीकडच्या काळात वकिली क्षेत्राचे रुपांतर व्यवसायाकडून व्यापाराकडे झाले आहे. न्यायदानाच्या क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता जपली पाहिजे. वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगितला पाहिजे, याकडेही चंद्रचूड यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र