शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Amitabh Gupta:"पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील..." पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 15:03 IST

सायबर गुन्ह्यांमध्ये तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी प्रयत्न केले; परंतु, गुन्ह्यांचे प्रमाणच इतके वाढले की, त्यात आणखी काही करायचे राहून गेले.

पुणे: पुण्यात काम करताना संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवतानाच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सायबर गुन्ह्यांमध्ये तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी प्रयत्न केले; परंतु, गुन्ह्यांचे प्रमाणच इतके वाढले की, त्यात आणखी काही करायचे राहून गेले. वाहतूक सुधारणेसाठी खूप काही करायचे होते, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त गुप्ता यांची मंगळवारी रात्री राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली. त्यानंतर बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गुप्ता म्हणाले की, पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील. गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्याचा बंदोबस्ताचा अनुभव शब्दांत सांगता येत नाही. या सोहळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. शहराचा वाढता विस्तार, वाहतुकीचा वाढता ताण, शहराची रचना अशा अनेक बाबी विचारात घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी मोक्का, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.

सायबरमधील ८० टक्के गुन्हे हे दाखलपात्र असतात; परंतु, त्याचा प्राथमिक तपास करून गुन्हे दाखल होण्यास वेळ लागतो. प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर कक्ष स्थापन करून तातडीने गुन्हे दाखल होतील, यासाठी प्रयत्न केला. गेल्या २ वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये इतकी वाढ झाली आहे की, इतर गुन्हे १० हजार असतील तर केवळ सायबर गुन्हे २० हजारांपेक्षा अधिक आहेत. त्यात आणखी बरेच काही करायचे होते, असेही त्यांनी सांगितले.सोशल मीडियावर सक्रिय असल्याबाबत ते म्हणाले की, आपली कोणाला मदत लागते का, कोणाचे काम अडले आहे का, हे समजावे, यासाठी आपण सोशल मीडियावर सक्रिय असतो. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर त्याला कमीतकमी वेळेत पोलिसांकडून प्रतिसाद मिळेल, यासाठी आपण दक्ष असतो. त्यासाठी सोशल मीडियाचा खूप उपयोग होत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

गैरव्यवहाराचा सखोल तपास केल्याचे समाधान

आरोग्य विभाग भरती, म्हाडा प्रश्न पत्रिका फुटीप्रकरण, लष्करी भरती प्रश्न पत्रिका फुटीप्रकरण, तसेच आभासी चलन प्रकरणातील फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. राजकीय दबाब किंवा हस्तक्षेप झाला नाही. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली, असे गुप्ता यांनी नमूद केले.

पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची गरज

पुणे शहराचा विस्तार पाहता मनुष्यबळ अपुरे आहे. पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची निर्मिती व्हायला हवी, असेही गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकTransferबदली