शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 17:36 IST

धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. त्यावेळी गिरीश बापट बाेलत हाेते.

पुणे : राजकीय पक्ष ही व्यक्तींची नाही, तर विचारांची लढाई असते, हे आपण विसरत चाललो आहोत. धनंजय थोरात हे सगळ्यांशी एकरुप होणारे आणि कार्यकर्ता कसा असावा, हे सांगणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. सध्या पक्षांतर्गत राजकीय अस्थिरता वाढत असून कार्यकर्ता कसा असावा, याचे प्रत्येक पक्षामध्ये प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

    धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, रामदास फुटाणे, शिरीष बोधनी, बिपीन गुपचुप, डॉ.विकास आबनावे, धनंजय थोरात यांच्या पत्नी शुभांगी थोरात यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्हयातील डॉ.राजेंद्र धामणे आणि डॉ.सुचेता धामणे यांना मुख्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरुण काकतकर, समाजसेवक प्रदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना देखील सन्मानित करण्यात आले. अरुण काकतकर यांनी पुरस्काराची रक्कम डॉ.धामणे यांच्या संस्थेला आणि शिरीष मोहिते यांनी लुई ब्रेल अंध अपंग संस्थेला दिली.     

     ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘धनंजय थोरात काँग्रेसचे होते आणि नगरसेवक होते हे मला ठाऊक नव्हते. पण, ‘भावसरगम’चे चाहते म्हणून माझा त्यांच्याशी परिचय होता. करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी लतादीदीला स्वरमाऊली ही पदवी दिली आहे. या स्वरमाऊलीच्या वाढदिवसानिमित्त मी माऊली प्रतिष्ठानला एक लाख रुपयांची देणगी जाहीर करतो.’ 

    मोहन जोशी म्हणाले, समाजात अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. समाजामध्ये त्यांना व्यासपीठ दिले गेले नाही, अशांची निवड प्रतिष्ठानतर्फे केली जाते. त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचवून त्यातून समाजात प्रेरणा निर्माण व्हावी, हा त्यामागील हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

बालचित्रवाणीतील ठेवा डिजीटाईज करा बंद पडलेले दुकान असे म्हणून जी बालचित्रवाणी बंद झाली. त्याकरीता मी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला आहे. बंद पडलेल्या या दुकानात कोण कोण होते, त्या ५०० लोकांची यादी देखील मी बालभारतीकडे दिली आहे. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे देखील आहेत. ते चित्रीकरण ताबडतोब डिजीटाईज करा. जेणेकरुन हा सांस्कृतिक अमूल्य ठेवा पुढच्या पिढीसमोर ठेवता येईल, अशी मागणी अरुण काकतकर यांनी गिरीष बापट यांच्याकडे केली. 

 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटcongressकाँग्रेसnewsबातम्या