शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहण्यायोग्य उत्तम शहर वाहतूककोंडीने बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 02:35 IST

देशात राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने उत्तम क्रमांक पटकाविला असला तरी येथील वाहतूककोंडीचे काय करायचे, असा प्रश्न आहे. दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीने पुणेकर बेजार झाला आहे.

पुणे - देशात राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने उत्तम क्रमांक पटकाविला असला तरी येथील वाहतूककोंडीचे काय करायचे, असा प्रश्न आहे. दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीने पुणेकर बेजार झाला आहे. माणसांपेक्षा वाहने जास्त झाली की हे होणार होते़ त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे़ संस्था आणि प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक आदींचा विचार करून ही यादी तयार केली आहे. पण यामध्ये पुणेकरांना दररोजच्या जगण्यासाठी वाहतुकीच्या चक्रव्यूहातून कसा मार्ग काढावा लागतो, याचा उल्लेख नाही.पुण्यातील मध्यवस्तीत राहणे परवडत नसल्याने उपनगरांमध्ये राहण्याची पुणेकरांवर वेळ. दररोज किमान दोन तास वाहतूककोंडीचा अनुभव.नगर रस्त्यावर सर्वाधिक वाहतूककोंडी. सकाळी आणि सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळी प्रचंड गर्दीसिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल, राजाराम पूल येथपासून सुरू होणारी वाहतूककोंडी थेट धायरीपर्यंत कायम असते. सायंकाळी सिंहगड रस्त्याने जाणे म्हणजे किमान दीड तास वाहतूककोंडीत अडकणे.जंगली महाराज रस्त्यावर कधी अचानक वाहतूककोंडी होईल सांगता येत नाही.प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता या ठिकाणी वाहतूककोंडी सुरू झाल्यावर किमान अर्धा तास तरी सुटत नाही.लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी जाणे म्हणजे पुणेकरांच्या अंगावर काटा येतो. वाहन पार्किंगसाठी जागा मिळत नाही. रिक्षाने जायचे म्हटले तरी केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावर अडकावेच लागते.पुणे स्टेशन परिसर म्हणजे शहराचे केंद्र. बाहेरचा माणूस आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा वाहतूककोंडीत अडकतो.मेट्रो भुयारी की वरून यात आपण अनेक वर्षे वाया घालविली़ आता ती प्रत्यक्षात येत असली तरी तिला आणखी काही काळ जावा लागणार आहे़ सार्वजनिक वाहतूक सुविधा म्हणून जिच्याकडे पाहिले जाते, त्या पीएमपीएमएलची अवस्था कधीही विश्वासार्ह नव्हती आणि नाही़ तिच्यात मूलभूत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न कधीही झाला नाही़मुंबईत ४ ते ५ किलोमीटरच्या रस्त्यांवरील सिग्नल एकापाठोपाठ सिंक्रोनायझेशनमुळे लागोपाठ मिळतात. पुण्यात हे चित्र दिसत नाही. रस्त्यांवरील जवळजवळचे सिग्नल सिंक्रोनाईज करणे, मोठ्या रस्त्यांवर लेन शिस्त पाळण्यासाठी वाहनांना बाध्य करणे़ वारंवार वाहतूककोंडी होणाºया ठिकाणाची पाहणी करून तेथील वाहतुकीत काही बदल करून ती कोंडी सोडविता येईल का, यासाठी प्रयत्न करण्याची जरुरी आहे़वाहतूककोंडीची कारणेसंपन्नता वाढली : पुण्यामध्ये संपन्नता वाढल्यामुळे एके काळी सायकलींचे शहर दुचाकींचे आणि मोटारींचे होऊ लागले आहे. प्रत्येक घरात किमान दोन ते तीन दुचाकी आहेतच; पण आता मोटारही आली आहे. मोटारींच्या वाढत्या संख्येचा ताण रस्त्यांवर येतो.छोट्या अंतरावर जाण्यासाठी खासगी कॅब सेवेचा वापर वाढला आहे.शहरात वाहने वाढली; परंतु रस्त्यांची रुंदी वाढली नाही. उलट सुशोभीकरणासारख्या प्रकल्पांमुळे कमीच झाली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPuneपुणे