शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांबाबत टोलवाटोलवी, बीआरटी मार्गातील संख्या वाढली, एकही अपघात झाला नसल्याचा पीएमपीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:29 IST

सार्वजनिक वाहतूक गतिमान करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, या मार्गाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बीआरटी मार्गातील अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नसल्याचा दावा पीएलपी करत आहे.

- राहुल शिंदेपुणे : सार्वजनिक वाहतूक गतिमान करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिस्ट (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात आला. मात्र, या मार्गाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बीआरटी मार्गातील अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नसल्याचा दावा पीएलपी करत आहे, तर अपघातांची जबाबदारी पालिका प्रशासनाची नाही तर पीएमपीची आहे, असे उत्तर पालिकेच्या अधिका-यांकडून दिले जात आहे.संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गातून सर्रासपणे खासगी वाहने जात आहेत. त्यातही संगमवाडी ते सादलबाबा चौक या बीआरटी मार्गातून सर्वाधिक दुचाकी व चारचाकी वाहने जातात. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारचाकी गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या समोरूनही खासगी वाहने बीआरटी मार्गातून जात होती. बीआरटी मार्गातून पीएमपी बसव्यतिरिक्त इतर वाहनांनी जाणे बेकायदेशीर आहे. खासगी वाहनांना रोखण्यासाठी पीएमपीने बीआरटी मार्गांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली. परंतु, सुरक्षारक्षकांशी वाद घालून; काही वेळा हाणामारीवर उतरून चारचाकी चालक व दुचाकीस्वार संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात घुसत आहेत. एकाही वाहनावर कारवाई होत नसल्याने दररोज बीआरटीतून जाणाºयांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढत चालली आहे. मात्र, वर्षभरात बीआरटी मार्गात एकही अपघात झाला नाही, असा दावा पीएमपीच्या प्रसिद्धी विभागाकडून करण्यात आला आहे. तसेच पालिका प्रशासनाने यात सहकार्य करावे, अशी अपेक्षा काही अधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.बीआरटी परिसराजवळ राहणारे काही नागरिकच दररोज या मार्गातून जात आहेत. तसेच बीआरटीत घुसणाºयांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिव्या खाव्या लागतात. काही वाहनचालकांनी तर सुरक्षारक्षकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत.बीआरटीतून जाणाºया वाहनांचे क्रमांक सुरक्षारक्षकांकडून नोंदविले जातात. परंतु, एकाही वाहनचालकावर कारवाई होत नाही. ट्रक, टेम्पो, स्कूल बस, पाण्याचा टँकर, एसटी बस यांसह पोलिसांची वाहनेसुद्धा बीआरटी मार्गातून जातात. त्यामुळे कारवाई कोण कोणावर करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.बीआरटी मार्ग केवळ ‘बस’साठी आहे. त्यासंदर्भातील फलक पालिकेकडून बीआरटी मार्गावर लावण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियमन करणे हे पालिकेचे नाही तर पीएमपीचे काम आहे.- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महानगरपालिका, पुणेबारआरटी मार्गातून केवळ बस जाणे, अपेक्षित आहे. या मार्गातून जाणा-या इतर खासगी वाहनांवर पोलिसांच्या मदतीने नियमितपणे दंडात्मक कारवाई केली जाते. इतर वाहने या मार्गातून जाऊ नयेत, यासाठीच सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी