शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:40 IST

दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले

पुणे : दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले, पण सास-यांनी दया दाखवून घरावरील एक छोटी रूम रिकामी करून त्यांची राहण्याची सोय करून दिली. पण दोघी बहिणींचे आणि त्यांच्या मुलांचे खाण्याचे - पिण्याचे हाल होऊ लागले. नव-यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास ते आरडाओरड करून निघून जात असतं. त्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. मात्र नांदायला येण्यासाठी अर्ज केल्याचा राग मनात धरून त्यांचा किराणा बंद करण्यात आला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

शेवटी तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केल्यावर दोन वर्षांच्या खडतर परिस्थितीनंतर त्यांना पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. प्राजक्ता आणि सुरेखा (नावे बदललेली) या दोघींना लग्नानंतर क्षुल्लक कारणांच्या वादामुळे खडतर आयुष्य जगण्याची वेळ आली. त्यांना घराबाहेर काढले. दोघी बहिणींच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी सामंजस्याने वाद मिटवण्याचे अतोनात प्रयत्न करून सुध्दा सासू ने घरा मध्ये घेतले नाही. हिंदू मॅरेज अँक्ट, १९५५ च्या ‘कलम ९’ नुसार त्यांनी न्यायालयात नांदायला येण्याचा अर्ज केला. त्यानंतर त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली. मुलांना व सुनांना खाण्यासाठी कधीतरी दिला जाणारा किराणाही बंद करण्यात आला.  दोघी बहिणींना एक वेळचे मिळणारे जेवणही बंद झाले. त्या दोघींनी वकिलामार्फत तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केला. मात्र कोरोनानंतर लॉकडाऊन लागला.

सामाजिक कार्य करणा-या लोकांकडून मिळणा-या किराणा मालाच्या किटवर त्यांना आपले पोट कसेबसे भागवावे लागत होते. अखेर दोन वर्षांच्या खडतर परिस्थिती नंतर न्यायालयाने दोघी बहिणींना तात्पुरती पोटगी च्या अर्जाच्या तारखेपासून (दोन वर्षा पासून) पोटगी देण्याचा आदेश दिला. मुलांच्या शाळेची फी जेव्हा द्यावी लागेल तेव्हा नव-यांनी ती द्यावी तसेच अर्जाचा खर्च सुध्दा नव-यांनी अर्जदार यांना द्यावा असे आदेशात नमूद केले आहे. दोघी बहिणींच्या वतीने अँड. संग्राम माधवराव जाधव व अँड. प्राची संग्राम जाधव यांनी काम पाहिले.

''कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मर्यादित वेळेत आणि मर्यादित कार्यक्षमतेत न्यायालयाचे कामकाज चालू होते. या संधी चा फायदा घेऊन कधी वडील आजारी आहेत तर कधी इतर कारणांमुळे न्यायालयाचे प्रकरण लांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे अँड. संग्राम माधवराव जाधव (बहिणींचे वकील) यांनी सांगितले.''

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCourtन्यायालयWomenमहिला