शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:40 IST

दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले

पुणे : दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले, पण सास-यांनी दया दाखवून घरावरील एक छोटी रूम रिकामी करून त्यांची राहण्याची सोय करून दिली. पण दोघी बहिणींचे आणि त्यांच्या मुलांचे खाण्याचे - पिण्याचे हाल होऊ लागले. नव-यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास ते आरडाओरड करून निघून जात असतं. त्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. मात्र नांदायला येण्यासाठी अर्ज केल्याचा राग मनात धरून त्यांचा किराणा बंद करण्यात आला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

शेवटी तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केल्यावर दोन वर्षांच्या खडतर परिस्थितीनंतर त्यांना पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. प्राजक्ता आणि सुरेखा (नावे बदललेली) या दोघींना लग्नानंतर क्षुल्लक कारणांच्या वादामुळे खडतर आयुष्य जगण्याची वेळ आली. त्यांना घराबाहेर काढले. दोघी बहिणींच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी सामंजस्याने वाद मिटवण्याचे अतोनात प्रयत्न करून सुध्दा सासू ने घरा मध्ये घेतले नाही. हिंदू मॅरेज अँक्ट, १९५५ च्या ‘कलम ९’ नुसार त्यांनी न्यायालयात नांदायला येण्याचा अर्ज केला. त्यानंतर त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली. मुलांना व सुनांना खाण्यासाठी कधीतरी दिला जाणारा किराणाही बंद करण्यात आला.  दोघी बहिणींना एक वेळचे मिळणारे जेवणही बंद झाले. त्या दोघींनी वकिलामार्फत तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केला. मात्र कोरोनानंतर लॉकडाऊन लागला.

सामाजिक कार्य करणा-या लोकांकडून मिळणा-या किराणा मालाच्या किटवर त्यांना आपले पोट कसेबसे भागवावे लागत होते. अखेर दोन वर्षांच्या खडतर परिस्थिती नंतर न्यायालयाने दोघी बहिणींना तात्पुरती पोटगी च्या अर्जाच्या तारखेपासून (दोन वर्षा पासून) पोटगी देण्याचा आदेश दिला. मुलांच्या शाळेची फी जेव्हा द्यावी लागेल तेव्हा नव-यांनी ती द्यावी तसेच अर्जाचा खर्च सुध्दा नव-यांनी अर्जदार यांना द्यावा असे आदेशात नमूद केले आहे. दोघी बहिणींच्या वतीने अँड. संग्राम माधवराव जाधव व अँड. प्राची संग्राम जाधव यांनी काम पाहिले.

''कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मर्यादित वेळेत आणि मर्यादित कार्यक्षमतेत न्यायालयाचे कामकाज चालू होते. या संधी चा फायदा घेऊन कधी वडील आजारी आहेत तर कधी इतर कारणांमुळे न्यायालयाचे प्रकरण लांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे अँड. संग्राम माधवराव जाधव (बहिणींचे वकील) यांनी सांगितले.''

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCourtन्यायालयWomenमहिला