शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:40 IST

दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले

पुणे : दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले, पण सास-यांनी दया दाखवून घरावरील एक छोटी रूम रिकामी करून त्यांची राहण्याची सोय करून दिली. पण दोघी बहिणींचे आणि त्यांच्या मुलांचे खाण्याचे - पिण्याचे हाल होऊ लागले. नव-यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास ते आरडाओरड करून निघून जात असतं. त्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. मात्र नांदायला येण्यासाठी अर्ज केल्याचा राग मनात धरून त्यांचा किराणा बंद करण्यात आला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

शेवटी तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केल्यावर दोन वर्षांच्या खडतर परिस्थितीनंतर त्यांना पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. प्राजक्ता आणि सुरेखा (नावे बदललेली) या दोघींना लग्नानंतर क्षुल्लक कारणांच्या वादामुळे खडतर आयुष्य जगण्याची वेळ आली. त्यांना घराबाहेर काढले. दोघी बहिणींच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी सामंजस्याने वाद मिटवण्याचे अतोनात प्रयत्न करून सुध्दा सासू ने घरा मध्ये घेतले नाही. हिंदू मॅरेज अँक्ट, १९५५ च्या ‘कलम ९’ नुसार त्यांनी न्यायालयात नांदायला येण्याचा अर्ज केला. त्यानंतर त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली. मुलांना व सुनांना खाण्यासाठी कधीतरी दिला जाणारा किराणाही बंद करण्यात आला.  दोघी बहिणींना एक वेळचे मिळणारे जेवणही बंद झाले. त्या दोघींनी वकिलामार्फत तात्पुरत्या पोटगीसाठी अर्ज केला. मात्र कोरोनानंतर लॉकडाऊन लागला.

सामाजिक कार्य करणा-या लोकांकडून मिळणा-या किराणा मालाच्या किटवर त्यांना आपले पोट कसेबसे भागवावे लागत होते. अखेर दोन वर्षांच्या खडतर परिस्थिती नंतर न्यायालयाने दोघी बहिणींना तात्पुरती पोटगी च्या अर्जाच्या तारखेपासून (दोन वर्षा पासून) पोटगी देण्याचा आदेश दिला. मुलांच्या शाळेची फी जेव्हा द्यावी लागेल तेव्हा नव-यांनी ती द्यावी तसेच अर्जाचा खर्च सुध्दा नव-यांनी अर्जदार यांना द्यावा असे आदेशात नमूद केले आहे. दोघी बहिणींच्या वतीने अँड. संग्राम माधवराव जाधव व अँड. प्राची संग्राम जाधव यांनी काम पाहिले.

''कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मर्यादित वेळेत आणि मर्यादित कार्यक्षमतेत न्यायालयाचे कामकाज चालू होते. या संधी चा फायदा घेऊन कधी वडील आजारी आहेत तर कधी इतर कारणांमुळे न्यायालयाचे प्रकरण लांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे अँड. संग्राम माधवराव जाधव (बहिणींचे वकील) यांनी सांगितले.''

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCourtन्यायालयWomenमहिला