शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत गांधी मार्गाने आंदोलन, २ ऑक्टोबरनंतर हा लढा गांधी मार्गाने नसेल; बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:38 IST

गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

चाकण : शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा लढा हा केवळ मतांसाठी नसून त्यांच्या वेदना थांबविण्यासाठी आहे, असे ठाम मत माजी मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले. गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आतापर्यंत गांधी मार्गाने आंदोलन केले गेले. मात्र, २ ऑक्टोबरनंतर हा लढा गांधी मार्गाने नसेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यापूर्वी अन्नत्याग, पदयात्रा, चक्काजाम आंदोलने झाली असून, यापुढे पाच शेतकरी हक्क परिषदा घेतल्या जाणार आहेत. यापैकी पहिली परिषद आज आंबेठाण (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला किमान हमीभाव, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४८ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ५८ रुपये दर, २०२५-२६ च्या ऊसगाळप हंगामासाठी प्रतिटन ४,४०० रुपये दर, कांदाउत्पादकांना प्रतिक्विंटल किमान २,५०० रुपये दर, दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन आणि मोफत घरे; ५५ वर्षांवरील शेतकऱ्यांना १०,००० रुपये पेन्शन, मेंढपाळ आणि मच्छीमारांना संरक्षण, बेरोजगार युवकांना नोकऱ्या, उसाच्या थकीत एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशानुसार १५ टक्के व्याजासह भरपाई आदी मागण्या यावेळी बच्चू कडू यांनी केल्या.

शरद जोशी यांच्या स्मारकासाठी प्रयत्न

बच्चू कडू यांनी शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या अंगारमळा येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला नमन केले. मात्र, त्यांच्या राहत्या घराची आणि परिसराची दुरवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. ‘सरकारपेक्षा आमची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवस स्मृतिस्थळी श्रमदान करावे वाटत नाही, ही शरमेची बाब आहे,” असे ते म्हणाले. पुढील काळात सर्वांना एकत्रित करून शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूRaju Shettyराजू शेट्टीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार