शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत गांधी मार्गाने आंदोलन, २ ऑक्टोबरनंतर हा लढा गांधी मार्गाने नसेल; बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:38 IST

गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

चाकण : शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा लढा हा केवळ मतांसाठी नसून त्यांच्या वेदना थांबविण्यासाठी आहे, असे ठाम मत माजी मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले. गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आतापर्यंत गांधी मार्गाने आंदोलन केले गेले. मात्र, २ ऑक्टोबरनंतर हा लढा गांधी मार्गाने नसेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यापूर्वी अन्नत्याग, पदयात्रा, चक्काजाम आंदोलने झाली असून, यापुढे पाच शेतकरी हक्क परिषदा घेतल्या जाणार आहेत. यापैकी पहिली परिषद आज आंबेठाण (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला किमान हमीभाव, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४८ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ५८ रुपये दर, २०२५-२६ च्या ऊसगाळप हंगामासाठी प्रतिटन ४,४०० रुपये दर, कांदाउत्पादकांना प्रतिक्विंटल किमान २,५०० रुपये दर, दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन आणि मोफत घरे; ५५ वर्षांवरील शेतकऱ्यांना १०,००० रुपये पेन्शन, मेंढपाळ आणि मच्छीमारांना संरक्षण, बेरोजगार युवकांना नोकऱ्या, उसाच्या थकीत एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशानुसार १५ टक्के व्याजासह भरपाई आदी मागण्या यावेळी बच्चू कडू यांनी केल्या.

शरद जोशी यांच्या स्मारकासाठी प्रयत्न

बच्चू कडू यांनी शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या अंगारमळा येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला नमन केले. मात्र, त्यांच्या राहत्या घराची आणि परिसराची दुरवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. ‘सरकारपेक्षा आमची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवस स्मृतिस्थळी श्रमदान करावे वाटत नाही, ही शरमेची बाब आहे,” असे ते म्हणाले. पुढील काळात सर्वांना एकत्रित करून शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूRaju Shettyराजू शेट्टीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार