शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत गांधी मार्गाने आंदोलन, २ ऑक्टोबरनंतर हा लढा गांधी मार्गाने नसेल; बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:38 IST

गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

चाकण : शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा लढा हा केवळ मतांसाठी नसून त्यांच्या वेदना थांबविण्यासाठी आहे, असे ठाम मत माजी मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले. गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आतापर्यंत गांधी मार्गाने आंदोलन केले गेले. मात्र, २ ऑक्टोबरनंतर हा लढा गांधी मार्गाने नसेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यापूर्वी अन्नत्याग, पदयात्रा, चक्काजाम आंदोलने झाली असून, यापुढे पाच शेतकरी हक्क परिषदा घेतल्या जाणार आहेत. यापैकी पहिली परिषद आज आंबेठाण (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला किमान हमीभाव, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४८ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ५८ रुपये दर, २०२५-२६ च्या ऊसगाळप हंगामासाठी प्रतिटन ४,४०० रुपये दर, कांदाउत्पादकांना प्रतिक्विंटल किमान २,५०० रुपये दर, दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन आणि मोफत घरे; ५५ वर्षांवरील शेतकऱ्यांना १०,००० रुपये पेन्शन, मेंढपाळ आणि मच्छीमारांना संरक्षण, बेरोजगार युवकांना नोकऱ्या, उसाच्या थकीत एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशानुसार १५ टक्के व्याजासह भरपाई आदी मागण्या यावेळी बच्चू कडू यांनी केल्या.

शरद जोशी यांच्या स्मारकासाठी प्रयत्न

बच्चू कडू यांनी शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या अंगारमळा येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला नमन केले. मात्र, त्यांच्या राहत्या घराची आणि परिसराची दुरवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. ‘सरकारपेक्षा आमची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवस स्मृतिस्थळी श्रमदान करावे वाटत नाही, ही शरमेची बाब आहे,” असे ते म्हणाले. पुढील काळात सर्वांना एकत्रित करून शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूRaju Shettyराजू शेट्टीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार