शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

भीमा नदीवरील बंधाऱ्याचा ढापा निखळला, हजारो लिटर पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:22 AM

खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच बंधा-याला बसवण्यात आलेले लोखंडी ढापे कमकुवत असल्यामुळे पाण्याचा दाब वाढून एक ढापा निखळला आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

दावडी -  खरपुडी (ता. खेड) येथील भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर बंधा-याचा एक ढापा निखळल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने काल (दि. ८) बातमी छापली होती. चासकमान धरणातून चार दिवसांपूर्वी भीमा नदीपात्रावरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी पाणी सोडले होते. खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच बंधा-याला बसवण्यात आलेले लोखंडी ढापे कमकुवत असल्यामुळे पाण्याचा दाब वाढून एक ढापा निखळला आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.शुक्रवारी चासकमान धरणातून नदीपात्रात सोडलेले पाणी दुपारी बंद करण्यात आले. प्रशासनाने तातडीने याची दखल घेत खरपुडी बंधाºयाच्या तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्थानिक शेतकºयांच्या मदतीने या तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती करण्यासाठी सरसावले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा प्रयत्न असफल ठरला. पाटबंधारे कर्मचारी व शेतकरी यांनी झाडाचा पाला तोडून पोत्यामध्ये भरून ही पोती तुटलेल्या ढाप्याजवळ टाकली. मात्र, पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे त्यांनाही पाण्याने ओढून नेले.गेल्यावर्षी पाटबंधारे विभागाने या बंधाºयाला शंभर नवीन व जुने लोखंडी ढापे मिळून बसवण्यात आले होते. यंदा या पाटबंधारे विभागाला माहिती असूनही हलगर्जीपणामुळे पुन्हा तेच जीर्ण झालेले लोखंडी ढापे बसविण्यात आले. ढाप्यांची दुरुस्ती न केल्यास दोन दिवसांत हा बंधारा रिकामा होईल अशी शक्यता निवृत्ती गाडे, बाळासाहेब मांजरे, अशोक मांजरे, मनोहर मांजरे, संतोष मांजरे व लखन मांजरे यांनी व्यक्त केली.सायंकाळी पाणी केले बंदभीमा नदीपात्रावरील केदारेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, खरपुडी, वाटेकरवाडी व निमगाव येथील बंधारे चासकमान धरणातून पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरून शेल-पिंपळगाव येथील धरणात पाणी पोहोचले आहे. त्यामुळे आज (दि. ९) संध्याकाळी चासकमान धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात येणार आहे.या परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी चासकमान धरणामध्ये डिसेंबर महिन्याअखेर १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.यंदा मात्र कमी पावसामुळे धरणात सध्या ७९.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात चासकमान धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यास पाण्याचे आवर्तन सुरू आहे. अजून सहा महिने उन्हाळ्याचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे. अशी जर पाण्याची नासाडी होत असेल तर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे चांगल्या पद्धतीचे लोखंडी ढापे बंधाºयाच्या तळाशी लावणे गरजेचे होते. तसेच कमकुवत ढापे बसविल्यामुळे पाण्याचा दाब येऊन एक ढापा निखळला आहे. या ढाप्याची आजच दुरुस्ती करून गळती थांबविण्यात येणार आहे.- उत्तम राऊत, उपअभियंता,चासकमान पाटबंधारेविभाग खेड 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी