शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

अपघातामुळे वर्षात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 17:11 IST

राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’राबविली जात आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षण विभाग: शाळांना काळजी घेण्याच्या सूचना

पुणे: दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने वाहन अपघात, पाण्यात बुडून आणि साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहेत.त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी,याबाबतच्या सूचना प्राध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’ राबविली जात आहे. पूर्वी खासगी विमा कंपनी मार्फत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जात होती. परंतु, अपघातामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २०११ पासून शासनाने स्वत: ७५ हजार रुपयांचा निधी देण्यास सुरूवात केली.तसेच अपघाताच्या तिव्रतेनुसार विद्यार्थ्यांना ५० ते ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १ हजार ६९ तर २०१८-१९ या वर्षात १,१९० अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर २० टक्के विद्यार्थ्यांना अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले.अपघातामुळे मृत्यू होणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतीच पुण्यातील गटशिक्षण अधिका-यांची बैठक घेतली. त्यात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावे,अशा सूचना करण्यात आल्या. यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून सर्वत्र पाणी साठलेले आहे. तसेच शाळेच्या परिसरात गवत वाढले आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये व शाळा परिसरातील गवतामध्ये साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना पाण्याचे आकर्षण असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांमध्ये साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील गवत काढून टाकावे, अशा सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन्ही गेल्यामुळे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक डोळा किंवा हात निकामी झाल्यास विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यूमुखी पडणा-या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. रस्त्याचे नियम,पाणी,साप आदी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी,अशा सुचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीAccidentअपघात