शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अपघातामुळे वर्षात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 17:11 IST

राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’राबविली जात आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षण विभाग: शाळांना काळजी घेण्याच्या सूचना

पुणे: दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने वाहन अपघात, पाण्यात बुडून आणि साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहेत.त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी,याबाबतच्या सूचना प्राध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’ राबविली जात आहे. पूर्वी खासगी विमा कंपनी मार्फत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जात होती. परंतु, अपघातामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २०११ पासून शासनाने स्वत: ७५ हजार रुपयांचा निधी देण्यास सुरूवात केली.तसेच अपघाताच्या तिव्रतेनुसार विद्यार्थ्यांना ५० ते ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १ हजार ६९ तर २०१८-१९ या वर्षात १,१९० अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर २० टक्के विद्यार्थ्यांना अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले.अपघातामुळे मृत्यू होणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतीच पुण्यातील गटशिक्षण अधिका-यांची बैठक घेतली. त्यात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावे,अशा सूचना करण्यात आल्या. यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून सर्वत्र पाणी साठलेले आहे. तसेच शाळेच्या परिसरात गवत वाढले आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये व शाळा परिसरातील गवतामध्ये साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना पाण्याचे आकर्षण असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांमध्ये साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील गवत काढून टाकावे, अशा सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन्ही गेल्यामुळे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक डोळा किंवा हात निकामी झाल्यास विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यूमुखी पडणा-या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. रस्त्याचे नियम,पाणी,साप आदी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी,अशा सुचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीAccidentअपघात