शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

घाण, गुन्हेगारीमुळे नरकयातना, जनता वसाहत, समस्यांच्या दलदलित राहतात हजारो नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 3:25 AM

जनता वसाहतीमध्ये शौचालयांची बिकट अवस्था आहे. अस्वच्छ परिसर, पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे रस्त्यावर वाहणारी घाण असे समस्येचे थैमान या परिसरात असून

- गौरव कदमसहकारनगर : जनता वसाहतीमध्ये शौचालयांची बिकट अवस्था आहे. अस्वच्छ परिसर, पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे रस्त्यावर वाहणारी घाण असे समस्येचे थैमान या परिसरात असून, गुन्हेगारी व अवैध धंदे, राजकीय व शासकीय दुर्लक्ष यामुळे येथील नागरिक नरकयातना जगत आहेत.आपल्या मुलांना भविष्यात निरोगीपणे जगता यावे, यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय योजनेतील वैयक्तिक शौचालय बांधणीतील गैरकारभार चव्हाट्यावर आला होता. म्हणजेच शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यातच शुद्ध फसवणूक होत असल्यास परिस्थिती आणखी दयनीय होत जाणार आहे.वसाहतीमध्ये मोठे दिखाऊ प्रकल्प करून सर्वसामान्य जनतेने भरलेल्या कराचा चुराडा करण्यापेक्षा स्वछता, शैक्षणिक, आरोग्यदृष्ट्या चांगले प्रकल्प उभारणे व टिकविणे येथे गरजेचे आहे. एकीकडे सर्वसामान्य पुणेकर पाणीपट्टी भरून पाणी काटकसरीने वापरत असताना जनता वसाहतमध्ये मात्र पिण्याच्या पाण्याचा अपव्यय पाहून अंगावर काटा येतो. सकाळच्या वेळेत येथे बºयाच ठिकाणी पाण्याचे नळ बंद केलेच जात नाहीत. पाणी वाहत मलवाहिन्यांत जात असते. अनेक ठिकाणी पाण्याच्या वाहिन्या नादुरुस्त असून, त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहण्यास मिळाले.गुन्हेगारी व अवैध धंदेजुन्या हिंदी सिनेमात पाहण्यास मिळत असत, तसेच अनेक भाई-दादा जनता वसाहत झोपडपट्टीमध्येसुद्धा पाहण्यास मिळतात. सध्या गुन्हेगारीचा आलेख कमी असला, तरी दारूअड्डे, अवैध धंदे येथे सुरूच आहेत. नाना प्रकारची व्यसने युवक करताना पाहण्यास मिळतात. युवकांना नोकरी-रोजगार नसल्याने व्यसने व गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे इतक्या मोठ्या जनता वसाहतीमध्ये एकही अभ्यासिका नाही. महिलांना सुद्धा रोजगार मोठ्या प्रमाणात नसल्याने धुण्या-भांड्याच्या कामांव्यतिरिक्त रोजगार, बचत गट, लघू महिला उद्योग सुरू होणे गरजेचे आहे.दवाखान्याचा अभाव, कचरा, रस्ते, शौचालये बेरोजगारी आणि वाढते अतिक्रमणयेथील पार्किंगचा प्रश्न मोठा असून, तो सोडविला जाणे गरजेचे आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, त्याचा पाठपुरावा आम्ही करतच आहोत; अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महिला व युवकांना चांगला रोजगार व प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे, अभ्यासिका वर्ग सुरू होणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी, अतिक्रमण विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने अतिक्रमणे व झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.- सूरज लोखंडे,सामाजिक कार्यकर्ताहे जनता वसाहतमध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत. जनता वसाहत येथे नागरिकांना अनेक समस्या भेडसावताना दिसत आहेत; परंतु वसाहत पातळीवर येथील रहिवाशांना भविष्यात स्वत:ची हक्काची घरे मिळाल्यानंतरही तेथील देखभाल खर्च करणे याची मानसिकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगली रोजगारनिर्मिती होणे गरजेचे आहे. महिलांना लघुउद्योग प्रकल्पाद्वारे सकारात्मक पाठिंबा देणे गरजेचे आहे. संस्कार, आरोग्य, निर्व्यसनीपणा, शिक्षण यामुळेच युवक विकसित होऊ शकतो. नागरिकांना स्वछतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. - राहुल माने,आदर प्रतिष्ठान, सामाजिक कार्यकर्तेराजकीय व शासकीय दुर्लक्ष ठरतेय अंधारमयजनता वसाहतीमध्ये राजकीय व शासकीय दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहारविरुद्ध मोठ्या संख्येने मोर्चा काढून प्रकल्पातील फसवणुकीस विरोध केलेला आहे.येथील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या हक्काची घरे होण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. तसेच जनता वसाहतीमधील कुठलाही नागरिक बेघर होऊ नये, यासाठी लढा देणार आहे.वस्तीतील समस्यांचे निराकरण होताना दिसत नाहीशौचालयांची बिकट अवस्था आहे. पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. डोंगर भागात, कॅनॉलकडेने कचरा साठून आहे. कचरा व्यवस्थापनचा आराखडाच तयार नाही.अ‍ॅम्ब्युलन्सच्या शेडने फक्त जागा अडवून ठेवली आहे. त्यात नागरिकांच्या गरजेला अ‍ॅम्ब्युलन्सच उपलब्ध नाही. परिसरात औषधफवारणी होत नसल्याने संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.जनता वसाहतीमध्ये लोकांच्या मागणीनुसार हक्काची पक्की घरे मिळणे गरजेचे आहे, यासाठी लोकांशी संवाद साधून शासकीय योजने अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण होत असल्यास त्याचे स्वागत आहे. या विषयात राजकारण न होता, नागरिकांनी पूर्ण माहिती घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. भविष्यात महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजही तीसपेक्षा जास्त बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व वचक नसल्यामुळे झोपड्या वाढत आहेत. संरक्षण भिंत होणे गरजेचे आहे. पार्किंगप्रश्नाबाबत प्रामाणिकपणे पाठपुरावा करूनही प्रशासकीय पातळीवर सहकार्य होत नसल्याने पार्किं ग प्रश्न सुटण्यास वेळ लागत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी कमी बजेटमध्ये हॉल तयार करण्यात आला आहे.- प्रिया गदादे-पाटील, नगरसेविका

टॅग्स :Puneपुणे