शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 11:07 IST

शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३२ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे देण्यात आली. त्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या बैठकांनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. या राजकारणावर रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. जे आता भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी भाजपविरोधात खूप वेळा भूमिका घेतली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

रोहित पवार म्हणाले, कुटुंब फुटणं हि फार गंभीर गोष्ट आहे. आपल्यावर वेळ आली कस वाटत हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. जी लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली आहेत. त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आज फक्त सत्ता मिळावी म्हणून तुम्ही विचारधारा बदलून सत्तेत जात असाल तर सामान्य लोकांनी काय तुमच्याकडे कस पाहावं. जेव्हा हे नेते एका विचारधारेला धरून भूमिका घेत होते. तेव्हा शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील. 

पवार साहेबानी काँग्रेस सोडल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. असे रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले, पवार साहेबानी काँग्रेस सोडली नाही. त्यांनी नवी पार्टी सुरु केली. लोक जुन्या गोष्टीचा दाखला देऊन काही बोलतील. राज्यात शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक अडचणी आहेत. ते सोडून राजकारणावर भाष्य केलं जातंय. त्यामुळे इथले व्यवसाय गुजरातला घेऊन जाणे बंद होणार आहे का? अधिवेशनात मुखमंत्री आश्वासन देऊन अंगणवाडी सेविकांच्या पगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भाव अशा प्रश्नाबद्दल बोलले जात नाही. फक्त राजकारणावर भाष्य केलं जातं. आताच्या परिस्थितीत ज्यांना पद मिळाली ते विकासासाठी गेलो म्हणत आहेत. पण विकास महत्वाचा असला तरी विचारसरणी महत्वाची असं मला वाटते. अजित पवारांना त्यांच्यासोबत असणारे चार, पाच लोक व्हिलन बनवत आहेत.  मतदार अजित पवार गटासोबत राहणार नाहीत. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेस