शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Alphonso Mango: यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच

By अजित घस्ते | Updated: March 25, 2025 16:53 IST

सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध

पुणे: लांबलेला परतीचा पाऊस, अपेक्षित थंडी नसणे आणि फेब्रुवारीपासून वाढलेले तापमान या वातावरणातील बदलाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. पहिल्या बहरातील आंब्याचा मोहोर गळून पडल्याने पिकावर परिणाम झाला असून, नेहमीच्या तुलनेत उत्पादन निम्म्याने घटले आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा दर कमालीचा वाढला आहे. सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात पडणार असून सामन्यांच्या आवाक्याबाहेरच आंबा गेला आहे.

आंब्यांच्या आगमनाची उत्सुकता उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वांना असते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंब्यांची आवक वाढण्यास सुरुवात होते. मार्च महिन्यात मोठी आवक होत असते. गुढी पाडव्याला आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा आंब्यांची आवक दर वर्षी मार्केटयाडर्डातील फळ बाजारात कमी प्रमाणात झाली आहे. मार्चमध्ये कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक होते. सध्या रोज ७०० ते एक हजार पेटी आंब्याची आवक होत आहे. पुढील महिन्यात आंब्यांची आवक वाढेल, असा अंदाज आहे.असे आहेत आंब्याचे भाव

     मार्च २०२४                           मार्च २०२५८०० ते १२०० रुपये                  १५०० ते २०००

पाडव्याला आंब्याचा दर , दरवर्षीपेक्षा जास्त 

हवामान बदलामुळे उत्पादन घटल्याने सध्या आंब्यांची आवक कमी होत आहे.अनेक जण गुढी पाडव्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आंबा खरेदी करतात. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजार भाव जास्त मागील वर्षाच्या पाडव्याच्या दरम्यान असलेली आवक आणि या वर्षीची आवक यामध्ये लगबग ३० ते ४० टक्क्याने घट झाली आहे. मागील वर्षी प्रति डझन ५०० ते ७०० रुपये होता. तोच यावर्षी ऐन पाडव्याला एक हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपये प्रति डझन ग्राहकांना घ्यावा लागत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आंबा उत्पादन ३० ते ४० टक्क्याने घट आहे. मागील वर्षे आवक लगबग प्रति दिवस पाडव्याच्या वेळी चार ते पाच हजार पेटी येत होती. तीच आता प्रति दिवस एक हजारापासून ते तीन हजारापर्यंत पेटी येत आहे. कोट :

व्यापारी वर्गांना यावर्षी रत्नागिरी आंबा विकण्यास अतिशय स्पर्धात्मक कार्य करावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आंबा पटवून देणे व रत्नागिरी बाजारात विकणे अतिशय कठीण जाणार आहे. सध्याचे पेटीचे बाजार ४ डझन ते ७ डझन तीन हजारापासून ते आठ हजारापर्यंत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत आवक ३० टक्केनी कमी आहे. यामुळे भावात तेजीत आहेत. - युवराज काची आंबा व्यापारी मार्केटयार्ड

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाAlphonso Mangoहापूस आंबाgudhi padwaगुढीपाडवाMONEYपैसाMarket Yardमार्केट यार्डfruitsफळे