शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 10:11 IST

कर्मयोगी सहकारीच्या ३४ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न ...

इंदापूर  : शारदीय महोत्सवाच्या नवव्या माळेच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला. या वेळी बोलताना यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कारखान्याचे संचालक भूषण प्रकाश काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी वृषाली काळे या उभयतांचे शुभहस्ते सोमवारी विधीवत पुजा संपन्न झाली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, या गाळप हंगामामध्ये आपण नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस कर्मयोगीस देवून सभासदांनी सहकार्य केले तर ते शक्य होणार आहे. ११ टक्क्यापेक्षा जास्तीचा साखर उतारा मिळवण्याच्या दृष्टीने अधिका-यांनी ही नियोजन करावे,अशी सूचना त्यांनी दिली.

तालुक्यात हरितक्रांती, धवलक्रांती घडवणारे लोकनेते कर्मयोगी कै. शंकरराव पाटील यांच्यामुळे इंदापूर तालुक्यात ३० लाख टन ऊस उभा आहे. त्यांनी उभारलेल्या कर्मयोगी परिवारावर तालुक्यातील ८४ गावांचा प्रपंच चालू आहे, असे ते म्हणाले. दि.१ नोव्हेंबरला कार्यक्षेत्रातील ५१ ज्येष्ठ सभासदांचे शुभहस्ते गाळप हंगाम सुरु करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सर्व तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज झाली आहे. यावर्षी ऊसाचा ॲडव्हॉन्स इतरांचे बरोबरीने किंवा काकणभर पुढेच असणार आहे याबाबत सर्वांनी निश्चिंत रहावे. हंगामातील सर्व ऊसबिले वेळेवरच मिळतील याबाबतची हमी आम्ही घेतलेली आहे,असे पाटील म्हणाले.

कारखान्यावरच्या विश्वासामुळे ऊस उत्पादक, वाहतुकदार व कामगारांनी कारखान्याकडे ऐच्छिक ठेवी ठेवलेल्या आहेत. कामगारांची मागील सर्व देणी पूर्ण केलेले आहेत,दिवाळी सणासाठी बोनस ही दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पराग जाधव, छगन भोंगळे, वसंत मोहोळकर, रतन देवकर, हनुमंत जाधव, भूषण काळे, विश्वास देवकाते, राहूल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, हिरालाल पारेकर, प्रदीप पाटील, शांतीलाल शिंदे, निवृत्ती गायकवाड, सतीश व्यवहारे, अशोक कदम, प्रवीण देवकर, माजी उपाध्यक्ष भागवत गटकुळ, माजी संचालक मानसिंग जगताप, सुभाष भोसले, भाऊसाहेब चोरमले, पिंटू काळे, नवनाथ काळे, शेतकरी संघटनेचे निलेश देवकर, अभंग अण्णा, पांडुरंग गलांडे, राघू काटे, कुबेर पवार इत्यादी पदाधिकारी, ऊस वाहतुक कंत्राटदार व सभासद कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

मागील हंगामात खेळते भांडवल कमी पडल्याने ऊसबीले,वाहतुक बीले,कमिशन व कामगारांचे पगार या सर्व गोष्टींना विलंब होत गेला. त्याचा आपणा सर्वांनाच खूप त्रास झाला,असे स्पष्ट करुन त्याबद्दल पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. कारखान्याची भूमिका मांडताना कर्मयोगीने नेहेमीच ऊस उत्पादकांना प्राधान्य दिले आहे. ६.५ साखर उतारा देणारा ४३४ जातीचा ऊस गाळपासाठी कर्मयोगीकडे येतो. जळीत झालेला ऊस वाहतूक करुन कर्मयोगीने गाळला आहे. इतर कारखान्यांनी तसे केल्याचे उदाहरण दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्षणिक स्वार्थ साधण्यासाठी चांगल्या चाललेल्या संस्थांच्या शक्तीस्थळावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले जातात. कर्मयोगीबद्दल ही तसेच अनुभव येत आहेत. तालुक्याचा शेतकरी हा कर्मयोगी परिवाराच्या नाळेशी जुडलेला आहे, तो क्षणिक भूलथापांना बळी पडत नाही हे मला ही माहिती आहे.

- हर्षवर्धन पाटील

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस