शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

यंदा अजित पवार एकटेच दिवाळी साजरी करणार; पुढील वर्षी कुटुंबासोबत - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:55 IST

अजित पवारांचे बंड लवकरच थंड होऊन वर्षभरातच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येईल

पुणे : अजित पवारांच्या बंडखोरीने अन् राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यात राजकीय महानाट्य सुरु झाले आहे. अशातच आज पावसाळी अधिवेशनालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही एक होतील, असे सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवारांना यंदा एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू असं ते म्हणाले आहेत. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

आंबेडकर म्हणाले, सरकारला सामान्य जनतेचे अथवा शेतकऱ्यांचे काही घेणेदेणे नाही. राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवारांची चर्चा असली तरी त्यांच्या गोंधळात शेतकरी सगळ्यात शेवटी गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडाबाबत आंबेडकर म्हणाले, अजित पवारांचे बंड लवकरच थंड होईल. वर्षभरातच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येईल. यंदाची दिवाळी अजित पवारांना एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. मात्र पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू."

भाजपला महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत. त्यांना राज्यात एकही विरोधक नकोय. यातूनच राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. दुर्दैवाने हे विरोधकांच्या लक्षात येत नाही. अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस