शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अकरावीच्या ३५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 20:12 IST

सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अकरावीच्या सुमारे ३० ते ३५ हजार जागा रिक्त राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देयेत्या १४ ऑगस्टपासून विशेष प्रवेश फेरीच्या माध्यमातून रिक्त जागांवर प्रवेश दिले जाणार विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारकयंदा अकरावी प्रवेशाच्या जागा वाढल्या असून दहावीच्या निकालात घट

पुणे : शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता येत्या १४ ऑगस्टपासून विशेष प्रवेश फेरीच्या माध्यमातून रिक्त जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र, सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अकरावीच्या सुमारे ३० ते ३५ हजार जागा रिक्त राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने दिले जात आहेत. त्यासाठी तीन प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विशेष फेरीच्या माध्यमातून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक होते. परंतु, अशा अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. त्यामुळे या विशेष फेरीतून अशा सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. तीन फेऱ्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे विशेष फेरीचे मेरिट खाली येईल, असे काही विद्यार्थ्यांना वाटत असेल. परंतु, पहिला पसंतीक्रम देवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीतून प्रवेश देण्यात येणार आल्याने विशेष फेरीचे मेरीट खाली येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.--

यंदा अकरावी प्रवेशाच्या जागा वाढल्या असून दहावीच्या निकालात घट झाली आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. त्यामुळे यंदा अकरावीच्या ३० ते ३५ हजार अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. मिनाक्षी राऊत, शिक्षण उपसंचालक, पुणे 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय