शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 22:25 IST

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध उठवण्यात आल्यामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध उठवण्यात आल्यामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. कुणीही नियमांचे पालन करतांना दिसत नाही. पुणे आणि पिंपरीच्या तुलनेत ग्रामीण भागाचा बाधित दर जास्त आहे. नियमांचे पालन होत नसल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात महा आवास अभियान ग्रामणी पुरस्कार सोहळ्याचे वितरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, आरोग्य तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. यामुळे नागरिकांनी गांभीर्याने घेत नियमांचे पालन करावे. ग्रामीण भागातून कोरोना समुळ नष्ट करण्यासाठी या पुढे कार्य केले आहे. कोरोना नियंत्रणात जिल्हा परिषेदेने महत्वाची भूमिका बजावली आहे. या पुढेही असेच चांगले काम जिल्हा परिषद करेन असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

महा आवास योजनेमुळे जिल्ह्यात चांगल्या दर्जाची घरे बांधण्यात आली आहे. या योजनेमुळे खऱ्या अर्थाने गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. येत्या काळात जिल्ह्यातील बेघरांना याद्वारे घरे देण्याचा प्रयत्न करणार, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, विभागीय आयुक्त सौरव राव, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, महा आवास योजने अंतर्गत घरांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या. घरे चांगली बांधली जावी या साठी गवंडीकामाचे प्रशिक्षण बेरोजगारांना देण्यात आले होते. याचा दुहेरी फायदा झाला. चांगल्या दर्जाची घरे निर्माण झाली आणि तरुणांना व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाले. बांधकाम व्यवसायाला सध्या चांगले दिवस आहे. त्यामुळे चांगली घरे बांधून चरितार्थ करावा. या अभियानातून बेघर असलेल्यांना लाभ मिळाला. ज्यांना ही घरे मिळाली आहे. त्यांनी या घरांची चांगली निगा राखावी. आजची परिस्थीती पाहता परिसर स्वच्छ ठेवावा. जेणे करून रोगराई दूर राहील, असे आवाहन पवार यांनी यावेळी लाभार्थ्यांना केले.

लसीकरण महत्वाचं... कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जिल्हा परिषदेने एकाच दिवसांत अडीच लाख नागरिकांना लस देऊन विक्रम केला आहे. या साठी बजाज समुहाचे मोठे सहकार्य मिळाले. येत्या काळात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण्क रन्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारzpजिल्हा परिषदHomeघर