शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्यू नाहीतर हत्या झाल्यात : भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद यांचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 22:51 IST

उत्तर प्रदेश सरकारने कोरोना काळात मृतांची आकडेवारी लपवली..

पुणे : उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात लाखो लोकांचे जीव गेले. सरकारने ठरविले असते तर त्यांचा जीव वाचवता येणे शक्य झाले असते. मात्र, तसे न करता तेथील सरकारकडून मृत्यूची आकडेवारी लपविण्यात आली. मात्र, ज्यावेळी नागरिकांचे मृतदेह गंगेत तरंगत आले ते स्वतःसाठी न्याय मागत होते. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात जे मृत्यू झाले ते मृत्यू नाहीतर हत्या आहे असा गंभीर आरोप भीम आर्मीचे आणि आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांनी करतानाच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.

भीम आर्मीचे आणि आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, प्रदेश प्रमुख प्रफुल शेंडे, राहुल प्रधान, नेहा शिंदे, राजेश गवळी आदी उपस्थित होते.

आजाद म्हणाले, कोरोना परिस्थितीवर काम करण्यापॆक्षा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू अशा राज्यात प्रचाराला गेले. एवढाच फिरण्याचा शौक असेल तर मुख्यमंत्रीपदावर दुसरा व्यक्ती बसवायला हवा. तसेच यावेळी त्यांनी जोपर्यंत उपेक्षितांची सत्ता येत नाही तोपर्यंत त्यांच्या अधिकारांचे हनन आणि हक्क चिरडले जाणार. पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणे हे राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक वारसांना शोभणारे नाही. या हक्कासाठी येत्या काळात येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या निवासाला घेराव घालणार असून प्रसंगी महाराष्ट्र बंद करू असा इशारा देखील दिला आहे. 

अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी यांना राज्य घटनेच्या कलम १६ (४) अ नुसार पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. राज्य सरकार हे आरक्षण देऊ शकते हे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलेले आहे. परंतु, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत वैचारिक वारसदार म्हणवणाऱ्यांकडून उपेक्षित समाजाची फसवणूक केली जात आहे. सरकारने गैरसमाजात राहू नये. आरक्षण मिळविण्याकरिता तीव्र आंदोलन उभे केले जाईल असे आजाद म्हणाले. 

मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पूर्ण पाठींबा आहे. लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला त्या प्रमाणात आरक्षण द्यायला हवे. त्यामुळे १०० टक्के आरक्षण लागू करावे असे आजाद म्हणाले. अनुसूचित जाती-जमाती यांनी खुल्या वर्गातून सर्व जागांवर निवडणुका लढविल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा आपले खरे प्रतिनिधी निवडून सभागृहात पाठवावेत. सध्या देशात अघोषित आणीबाणी असून अधिकारांचे दमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू