शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतीला अावश्यक तेवढा पाऊस नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 17:23 IST

मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही़.

पुणे : मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही़. १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १८ सप्टेंबरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही़. त्याचदरम्यान मॉन्सूनच्या परतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आता परतीच्या पावसावरच प्रामुख्याने आशा केंद्रीत झाल्या आहेत. 

    गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या तीनही विभागात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. याशिवाय अहमदनगर (-१३), धुळे व जळगाव (-१७), परभणी (-१५), यवतमाळ (-१३) टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ टक्के जादा पाऊस झाला असून ठाणे ११ टक्के, नांदेड ९ टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे. ईशान्य भारतातील काही राज्यांचा अपवाद वगळता सध्या संपूर्ण भारतात मॉन्सून थबकलेला आहे. अरबी समुद्र तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार न झाल्याने देशभरात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  महाराष्ट्रासारखीच अनेक राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. रायलसीमा भागात सरासरापेक्षा तब्बल ४६ टक्के पाऊस कमी झाला आहे.

    पुढील चार दिवस मॉन्सूनची स्थिती अशीच राहण्याची शक्यता असून १८ सप्टेंबर दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे मध्य भारतात काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असून त्याचा फायदा राज्यातील काही जिल्ह्यांना होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्के) सोलापूर (- ३१), सांगली (-३०), नंदूरबार (- २९), औरंगाबाद (-२५), बुलढाणा व वर्धा (- २४), लातूर (-२३), अमरावती व बीड (- २२), जालना (-२१)

१ जून ते १२ सप्टेंबर पर्यंत पडलेला पाऊस( मिमी) विभाग        प्रत्यक्ष        सरासरी        फरककोकण        २८२५़१        २७४२        ३मध्य महाराष्ट्र    ६२७़८        ६३४        -१मराठवाडा        ५१०़२        ५८९        -१३विदर्भ        ८२०़३        ८७५        -६ 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीWaterपाणी