शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकांच्या भिंती नाहीच - गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 20:48 IST

गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभारू नयेत व सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठामपणे सांगितले.

ठळक मुद्देराज्य सरकार सर्वधर्मीय सणांच्या संदर्भात ध्वनीक्षेपकाच्या मर्यादेबाबत धोरण तयार करणारसरकार याबाबतीत भूमिका मांडण्यात कमी पडले या आरोपात काही तथ्य नाही

पुणे : गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभारू नयेत व सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठामपणे सांगितले. ज्या मंडळांनी मिरवणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे, त्यांनाही आपले असेच आवाहन आहे असे ते म्हणाले. राज्य सरकार लवकरच सर्वधर्मीय सणांच्या संदर्भात ध्वनीक्षेपकाच्या मर्यादेबाबत धोरण तयार करणार आहे अशी माहिती बापट यांनी दिली. गणेशोत्सवच नाही तर कोणत्यात धमीर्यांच्या उत्सवात असा आवाज नको, राज्य सरकार त्याबाबतीत धोरण ठरवत आहे असे बापट यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक, महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यावेळी उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीत ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभारण्यावर सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्याबाबत नाराजी व्यक्त करत काही मंडळांनी मिरवणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना बापट म्हणाले, कर्णकर्कश्श आवाज करणे योग्य नाही. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाने त्याला मनाई केली आहे. त्यांच्या निर्णयाचा अवमान होईल असे काही करणे योग्य नाही. गेले १० दिवस उत्सव अत्यंत शांततेत पार पडला आहे. त्यामुळे मिरवणुकीत त्याला गालबोट लागेल असे कोणी काही करू नये. याबाबत सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बोलणे झाले  आहे. त्यांनीही ध्वनीक्षेपकांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान ठेवण्याचे मान्य केले आहे.ध्वनीक्षेपकांवरील बंदीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर बोलणे योग्य ठरणार नाही असे स्पष्ट करून बापट म्हणाले, जास्त क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांच्या आवाजाचा वृद्ध, लहान मुले, रुग्ण यांचा त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयाने त्यामुळेच मर्यादा घातली आहे. त्याचा आदर करणेच योग्य आहे. सरकार याबाबतीत भूमिका मांडण्यात कमी पडले या आरोपात काही तथ्य नाही. न्यायालयाचा अवमान होईल असे कोणीही काही करणार नाही याची खात्री आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत बापट म्हणाले, सरकार गुन्हे मागे घेत नाही. त्यासाठी असलेल्या समितीला तशी शिफारस करावी लागते. मागील ३ वर्षात सरकारने ९७ कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत समितीला शिफारस केली होती. ८३ प्रकरणांमध्ये ती मान्य करण्यात आली. १४ प्रकरणे नाकारण्यात आली. गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांबाबत कलम लावले असेल तर तसे गुन्हे मागे घेता येत नाही. याबाबत ज्यांनी आरोप केले त्यांनी माहिती घ्यावी, राजकीय आरोप करू नयेत. त्यासाठी वेगळे व्यासपीठ असते व तिथे झालेल्या आरोपांचा सामना करण्यास मी समर्थ आहे.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटGanesh Visarjanगणेश विसर्जनHigh Courtउच्च न्यायालय