शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

उन्हात पशू-पक्ष्यांची होतेय होरपळ, मुक्या जीवांसाठी प्रत्येकाने मदत करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:01 IST

घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.

भोसरी - घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.होळीनंतर उन्हाळा सुरू होतो. मात्र, यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा चढला. हा पारा चाळिशीला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी वा अन्य वन्यचर प्राणी यांवर हवामानातील बदल याचा परिणाम होत असतो.पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. शहरातील पशू-पक्ष्यांनाहीउन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डीहायड्रेशन होते. शरीरातले पाणी कमी झाल्याने ते आजारी पडतात.विविध उन्हाळी सांसर्गिक आजार होतात. अशा प्राण्यांवर वेळेत उपचार न केल्यास त्यांचा प्राणही जाण्याची शक्यता असते.पाळीव प्राण्यांना उपचार मिळतात. मात्र, इतर प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवणे अवघड झाले आहे. डीहायड्रेशनबरोबरच पचन संस्थेचे आजार, विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार, श्वसन संस्थेचे आजार पशू-पक्ष्यांना होतात.इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यांवर पशू-पक्षी आपली तहान भागवत असतात. शारीरिक थंडावादेखील शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीची पाणी पातळी घटत चालली आहे. खाणी, नैसर्गिक तळ्यांमधील पाणी आटले आहे. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करतात दिसतात.सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या त्या तुलनेने कमी आहे. त्यातच नुकतीच पानगळ झाल्याने झाडे उघडीबोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावलीही पशू-पक्ष्यांना उपलब्ध होत नाही. सिमेंट, डांबरी रस्त्यांमुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहरात घर व परिसरात पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करावेत. कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन प्राणिप्रेमींकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याचे पाहायला मिळत आहे.वाढत्या तापमानाचा फटका पशू-पक्ष्यांना बसत आहे. घार दुपारी उडत असते. दुपारच्या वेळेस प्रचंड प्रमाणात ऊन असते. त्यामुळे उष्माघाताचा धोका घारींना मोठ्या प्रमाणावर आहे. उष्माघात झालेल्या घारी उडत असताना अचानकपणे जमिनीवर पडतात. अशा घारींना काही काळ सावलीत ठेवा. तिच्या आसपास पाण्याची वाटी ठेवा. उष्माघाताने मरगळ येऊन पडलेले अन्य पक्षी आढळल्यास त्यांना हाताळू नका. त्यांना सावलीत ठेवा. पक्ष्यांना पाणी पाजायची विशिष्ट पद्धत आहे. मात्र आपण घाईघाईने पाणी पाजायला जातो. त्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेत पाणी अडकून त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पक्ष्यांना शक्य असेल, तर त्वरित महापालिकेचे प्राणिसंग्रहालय, पशुवैद्यकीय रुग्णालय अथवा जवळपास सर्पमित्र असल्यास त्यांच्याकडे सोपवावे. आपल्या घराच्या आसपास थंडाव्याच्या शोधात येणाºया पशू-पक्ष्यांना हटकू नका. गच्चीवर, बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवून आपण त्यांचा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करू शकतो.- दीपक सावंत, अभिरक्षक, बहिणीबाई चौधरी प्राणिसंग्रहालयप्राण्यांमधील उष्माघात कसा ओळखावा?उष्माघात झालेले प्राणी अस्वस्थ होतात. त्यांचे श्वसन तोंडावाटे जीभ बाहेर काढून मोठ्या प्रमाणात होते. तोंडातून लाळ गळते. डोळे निस्तेज होतात. नाकपुडीत रक्ताची धार लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्राण्यांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात दाखल करावे अथवा माहिती द्यावी. पशू-पक्ष्यांना छोट्याशा उपाययोजनांमधून उष्माघातापासून वाचवू शकतो. उष्माघाताचे प्राणी आढळल्यास या प्राण्यांच्या शरीरावर बर्फ लावावा अथवा थंड पाणी अंगावर शिंपडावे. माणसांप्रमाणेच प्राण्यांच्याही शरीरातील क्षारांची उन्हाळ्यात कमतरता होते. ती भरून काढण्यासाठी घरगुती साखरपाणी, आॅरगॅनिक गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात प्राण्यांमध्ये बहुतांशी सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे क्युरेटर दीपक सावंत यांनी सांगितले.पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजीस्वच्छ, थंडगार पाणी वारंवार उपलब्ध करून द्याप्राण्यांना ताजे अन्न द्यावेखाद्य व पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर टाळाउन्हाळ्यात सहज पचेल असे व कमी प्रमाणात खाद्य द्याप्राण्यांना डीहायड्रेशन होत असल्यास साखरपाणी, गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी द्यावेदुपारी १ ते ४ या वेळेत प्राण्यांना बाहेर मोकळे सोडू नयेप्राण्यांना उन्हात डांबरी रस्त्यावरून फिरवू नयेउन्हात लोखंडी पिंजºयात अथवा लोखंडी साखळ्यांनी प्राण्यांना बांधू नये.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या