शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

उन्हात पशू-पक्ष्यांची होतेय होरपळ, मुक्या जीवांसाठी प्रत्येकाने मदत करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:01 IST

घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.

भोसरी - घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.होळीनंतर उन्हाळा सुरू होतो. मात्र, यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा चढला. हा पारा चाळिशीला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी वा अन्य वन्यचर प्राणी यांवर हवामानातील बदल याचा परिणाम होत असतो.पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. शहरातील पशू-पक्ष्यांनाहीउन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डीहायड्रेशन होते. शरीरातले पाणी कमी झाल्याने ते आजारी पडतात.विविध उन्हाळी सांसर्गिक आजार होतात. अशा प्राण्यांवर वेळेत उपचार न केल्यास त्यांचा प्राणही जाण्याची शक्यता असते.पाळीव प्राण्यांना उपचार मिळतात. मात्र, इतर प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवणे अवघड झाले आहे. डीहायड्रेशनबरोबरच पचन संस्थेचे आजार, विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार, श्वसन संस्थेचे आजार पशू-पक्ष्यांना होतात.इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यांवर पशू-पक्षी आपली तहान भागवत असतात. शारीरिक थंडावादेखील शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीची पाणी पातळी घटत चालली आहे. खाणी, नैसर्गिक तळ्यांमधील पाणी आटले आहे. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करतात दिसतात.सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या त्या तुलनेने कमी आहे. त्यातच नुकतीच पानगळ झाल्याने झाडे उघडीबोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावलीही पशू-पक्ष्यांना उपलब्ध होत नाही. सिमेंट, डांबरी रस्त्यांमुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहरात घर व परिसरात पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करावेत. कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन प्राणिप्रेमींकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याचे पाहायला मिळत आहे.वाढत्या तापमानाचा फटका पशू-पक्ष्यांना बसत आहे. घार दुपारी उडत असते. दुपारच्या वेळेस प्रचंड प्रमाणात ऊन असते. त्यामुळे उष्माघाताचा धोका घारींना मोठ्या प्रमाणावर आहे. उष्माघात झालेल्या घारी उडत असताना अचानकपणे जमिनीवर पडतात. अशा घारींना काही काळ सावलीत ठेवा. तिच्या आसपास पाण्याची वाटी ठेवा. उष्माघाताने मरगळ येऊन पडलेले अन्य पक्षी आढळल्यास त्यांना हाताळू नका. त्यांना सावलीत ठेवा. पक्ष्यांना पाणी पाजायची विशिष्ट पद्धत आहे. मात्र आपण घाईघाईने पाणी पाजायला जातो. त्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेत पाणी अडकून त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पक्ष्यांना शक्य असेल, तर त्वरित महापालिकेचे प्राणिसंग्रहालय, पशुवैद्यकीय रुग्णालय अथवा जवळपास सर्पमित्र असल्यास त्यांच्याकडे सोपवावे. आपल्या घराच्या आसपास थंडाव्याच्या शोधात येणाºया पशू-पक्ष्यांना हटकू नका. गच्चीवर, बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवून आपण त्यांचा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करू शकतो.- दीपक सावंत, अभिरक्षक, बहिणीबाई चौधरी प्राणिसंग्रहालयप्राण्यांमधील उष्माघात कसा ओळखावा?उष्माघात झालेले प्राणी अस्वस्थ होतात. त्यांचे श्वसन तोंडावाटे जीभ बाहेर काढून मोठ्या प्रमाणात होते. तोंडातून लाळ गळते. डोळे निस्तेज होतात. नाकपुडीत रक्ताची धार लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्राण्यांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात दाखल करावे अथवा माहिती द्यावी. पशू-पक्ष्यांना छोट्याशा उपाययोजनांमधून उष्माघातापासून वाचवू शकतो. उष्माघाताचे प्राणी आढळल्यास या प्राण्यांच्या शरीरावर बर्फ लावावा अथवा थंड पाणी अंगावर शिंपडावे. माणसांप्रमाणेच प्राण्यांच्याही शरीरातील क्षारांची उन्हाळ्यात कमतरता होते. ती भरून काढण्यासाठी घरगुती साखरपाणी, आॅरगॅनिक गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात प्राण्यांमध्ये बहुतांशी सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे क्युरेटर दीपक सावंत यांनी सांगितले.पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजीस्वच्छ, थंडगार पाणी वारंवार उपलब्ध करून द्याप्राण्यांना ताजे अन्न द्यावेखाद्य व पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर टाळाउन्हाळ्यात सहज पचेल असे व कमी प्रमाणात खाद्य द्याप्राण्यांना डीहायड्रेशन होत असल्यास साखरपाणी, गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी द्यावेदुपारी १ ते ४ या वेळेत प्राण्यांना बाहेर मोकळे सोडू नयेप्राण्यांना उन्हात डांबरी रस्त्यावरून फिरवू नयेउन्हात लोखंडी पिंजºयात अथवा लोखंडी साखळ्यांनी प्राण्यांना बांधू नये.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या