शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उन्हात पशू-पक्ष्यांची होतेय होरपळ, मुक्या जीवांसाठी प्रत्येकाने मदत करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:01 IST

घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.

भोसरी - घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.होळीनंतर उन्हाळा सुरू होतो. मात्र, यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा चढला. हा पारा चाळिशीला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी वा अन्य वन्यचर प्राणी यांवर हवामानातील बदल याचा परिणाम होत असतो.पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. शहरातील पशू-पक्ष्यांनाहीउन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डीहायड्रेशन होते. शरीरातले पाणी कमी झाल्याने ते आजारी पडतात.विविध उन्हाळी सांसर्गिक आजार होतात. अशा प्राण्यांवर वेळेत उपचार न केल्यास त्यांचा प्राणही जाण्याची शक्यता असते.पाळीव प्राण्यांना उपचार मिळतात. मात्र, इतर प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवणे अवघड झाले आहे. डीहायड्रेशनबरोबरच पचन संस्थेचे आजार, विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार, श्वसन संस्थेचे आजार पशू-पक्ष्यांना होतात.इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यांवर पशू-पक्षी आपली तहान भागवत असतात. शारीरिक थंडावादेखील शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीची पाणी पातळी घटत चालली आहे. खाणी, नैसर्गिक तळ्यांमधील पाणी आटले आहे. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करतात दिसतात.सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या त्या तुलनेने कमी आहे. त्यातच नुकतीच पानगळ झाल्याने झाडे उघडीबोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावलीही पशू-पक्ष्यांना उपलब्ध होत नाही. सिमेंट, डांबरी रस्त्यांमुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहरात घर व परिसरात पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करावेत. कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन प्राणिप्रेमींकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याचे पाहायला मिळत आहे.वाढत्या तापमानाचा फटका पशू-पक्ष्यांना बसत आहे. घार दुपारी उडत असते. दुपारच्या वेळेस प्रचंड प्रमाणात ऊन असते. त्यामुळे उष्माघाताचा धोका घारींना मोठ्या प्रमाणावर आहे. उष्माघात झालेल्या घारी उडत असताना अचानकपणे जमिनीवर पडतात. अशा घारींना काही काळ सावलीत ठेवा. तिच्या आसपास पाण्याची वाटी ठेवा. उष्माघाताने मरगळ येऊन पडलेले अन्य पक्षी आढळल्यास त्यांना हाताळू नका. त्यांना सावलीत ठेवा. पक्ष्यांना पाणी पाजायची विशिष्ट पद्धत आहे. मात्र आपण घाईघाईने पाणी पाजायला जातो. त्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेत पाणी अडकून त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पक्ष्यांना शक्य असेल, तर त्वरित महापालिकेचे प्राणिसंग्रहालय, पशुवैद्यकीय रुग्णालय अथवा जवळपास सर्पमित्र असल्यास त्यांच्याकडे सोपवावे. आपल्या घराच्या आसपास थंडाव्याच्या शोधात येणाºया पशू-पक्ष्यांना हटकू नका. गच्चीवर, बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवून आपण त्यांचा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करू शकतो.- दीपक सावंत, अभिरक्षक, बहिणीबाई चौधरी प्राणिसंग्रहालयप्राण्यांमधील उष्माघात कसा ओळखावा?उष्माघात झालेले प्राणी अस्वस्थ होतात. त्यांचे श्वसन तोंडावाटे जीभ बाहेर काढून मोठ्या प्रमाणात होते. तोंडातून लाळ गळते. डोळे निस्तेज होतात. नाकपुडीत रक्ताची धार लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्राण्यांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात दाखल करावे अथवा माहिती द्यावी. पशू-पक्ष्यांना छोट्याशा उपाययोजनांमधून उष्माघातापासून वाचवू शकतो. उष्माघाताचे प्राणी आढळल्यास या प्राण्यांच्या शरीरावर बर्फ लावावा अथवा थंड पाणी अंगावर शिंपडावे. माणसांप्रमाणेच प्राण्यांच्याही शरीरातील क्षारांची उन्हाळ्यात कमतरता होते. ती भरून काढण्यासाठी घरगुती साखरपाणी, आॅरगॅनिक गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात प्राण्यांमध्ये बहुतांशी सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे क्युरेटर दीपक सावंत यांनी सांगितले.पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजीस्वच्छ, थंडगार पाणी वारंवार उपलब्ध करून द्याप्राण्यांना ताजे अन्न द्यावेखाद्य व पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर टाळाउन्हाळ्यात सहज पचेल असे व कमी प्रमाणात खाद्य द्याप्राण्यांना डीहायड्रेशन होत असल्यास साखरपाणी, गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी द्यावेदुपारी १ ते ४ या वेळेत प्राण्यांना बाहेर मोकळे सोडू नयेप्राण्यांना उन्हात डांबरी रस्त्यावरून फिरवू नयेउन्हात लोखंडी पिंजºयात अथवा लोखंडी साखळ्यांनी प्राण्यांना बांधू नये.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या