शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारच्या अन्य महत्त्वाच्या योजनांना फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:00 IST

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चाैधरी : आठवे दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान

पुणे : गेल्या काही दशकांत दलित, ओबीसी जागृत झाले. आता महिलादेखील जागृत होऊ लागल्या आहेत. राज्यात ७५०० रुपये महिलांच्या हातात आले. या पैशातून महिलांनी भाजी, साडी विक्री असे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे महिलांनी महायुतीला मतदान करण्याचे ठरविले. आता कोणतेही सरकार आल्यावर ही योजना बंद करता येणे कठीण आहे. स्थानिक पातळीवर ही परिस्थिती असली, तरी या योजनेमुळे सरकारच्या अन्य महत्त्वाच्या योजनांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ज्येष्ठ पत्रकार व राजकीय भाष्यकार नीरजा चौधरी यांनी सांगितले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) व पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या वतीने ८ वे दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानात ' पाॅलिटिकल डिसीजन मेकिंग एट् द टाॅप् ग्रोविन्ग् चॅलेंजेस" या विषयावर त्या बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण, लतिका पाडगावकर, अभय वैद्य यावेळी उपस्थित होते.नीरजा चौधरी म्हणाल्या, सर्वोच्च स्तरावर घेतलेले निर्णय देशातील कोट्यवधी लोकांवर, पिढ्यांवर परिणाम करणारे ठरतात. उदाहरणार्थ, मंडल आयोगाचा निर्णय. त्यानंतर देशात ओबीसीची शक्ती वाढू लागली. त्यामुळेच आज देशात ओबीसी असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणी घेतलेल्या निर्णयाने देशात गदारोळ झाला. ती परिस्थिती कशी हाताळायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातूनच मुस्लिमांचे लांगूलचालन हा शब्दप्रयोग सुरू झाला. पुढारलेला विचार करणाऱ्या पंतप्रधानांना जुन्या भारताला कसे हाताळायचे हे कळले नाही.प्रत्येक निवडणुकीत नवा मतदार उदयाला येतो. आज रोजगार देशातील सर्वांत ज्वलंत विषय असूनही तो निवडणुकीचा मुद्दा होत नाही. त्याशिवाय पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान असे मुद्दे मागे राहिले आहेत. जगातील कोणत्याही देशात भारताइतकी विविधता नाही. ही विविधता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. त्या बाबतीत निर्णय प्रक्रिया, धोरणांवर काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. रामकृष्णन रमण यांनी स्वागतपर भाषण केले. लिसा पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. अभय वैद्य यांनी आभार मानले.हे शतक देशातील महिलांचे..आतापर्यंत महिला त्यांच्या घरातील पुरुषांच्या मतानुसार मतदान करीत होत्या. आता ही परिस्थिती बदलत आहे. डोक्यावरचा पदर थोडा बाजूला होत आहे. पैसा हाती येणे हे महिलांसाठी सबलीकरण आहे. हे शतक देशातील महिलांचे असल्याचे नीरजा चौधरी म्हणाल्या. 

टॅग्स :Puneपुणेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाGovernmentसरकारMahayutiमहायुतीBJPभाजपा