शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Ajmal Kasab: ...तर कदाचित कसाबला २०२२ नंतरच फाशी झाली असती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:14 IST

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रमेश महाले यांना ‘कै. वसंतराव ढुमणे कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले...

पुणे : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याला पाहिल्यावर हा छोटा मुलगा काय गोळीबार करणार? असे वाटले होते. तोवर जनतेने त्याला मारून त्याचा हनुमान केला होता. साहेब, मी बिल्डरकडे बॉडीगार्ड आहे. फायरिंग सुरू झाल्यावर मी लपलो... हे कसाबने सांगितल्यावर मला त्याच्या सांगण्यात तथ्य वाटले. हा खरा अतिरेकी नाही, असे वाटले होते. सत्र न्यायालयात केस उभी राहिली तेव्हा त्याने माझी केस इथे चालवू नका, मी बालगुन्हेगार असल्याचा दावा केला. त्यावर न्यायालय म्हणाले, ‘कसाब उभे राहा.’ तेव्हा हा बालगुन्हेगार नाही, मोठा आहे असे सांगून त्याचा बचाव न्यायालयाने फेटाळला. त्यावेळी सरकारी वकिलांनी कसाबची संपूर्ण चौकशी करण्याचा अर्ज केला. पाच साक्षीदारांना तपासले. ती चौकशी जर झाली नसती तर कदाचित त्याला २०२२ नंतरच फाशी झाली असती, असा खुलासा मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी केला.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रमेश महाले यांना ‘कै. वसंतराव ढुमणे कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यानंतर राजेश दामले यांनी महाले यांची मुलाखत घेतली. त्यावेळी महाले यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण थरार कथन केला. यावेळी अजय ढुमणे, सोहनलाल सोनिगरा आणि नीलेश सोनिगरा उपस्थित होते.

अनेकदा पोलिस तपास करतात. मात्र, न्यायालयात त्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण होत नाही, अशी खंत व्यक्त करताना महाले म्हणाले, पाकिस्तान पुरस्कृत अनेक हल्ले हे २०१८ पूर्वी झाले आहेत. पण पाकिस्तानने ते हल्ले केल्याचे कधी मान्य केले नव्हते. पण आम्हाला जो पुरावा मिळाला त्यात पाकिस्तानने हा कट आमच्या देशात रचला गेला, हे मान्य केले. आम्ही न्यायालयीनदृष्ट्या हे सिद्ध केले. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदारांना असे वाटत होते की, आम्ही साक्ष दिली तर दाऊद इब्राहिमचे लोक आम्हाला मारतील. पण आम्ही लोकांना विश्वासात घेतले. हा खटला चार वर्षे चालला पण एकही साक्षीदार फितूर झाला नाही.

मुंबई किनारपट्टीवर दहशतवादी हल्ला होणार आहे, याची पूर्वकल्पना देण्यात आली असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले का? असे विचारले असता ते म्हणाले, समुद्र अथांग आहे. हल्ला होणार, असे रिपोर्ट येतच असतात. अनेकदा खोटी माहितीही दिली जाते. खरंतर खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाईसाठी कडक कायदा पाहिजे. खोटी माहिती देणाऱ्याला कमीत कमी १८ दिवस पोलिस कोठडीत ठेवायला हवे, असेही महाले म्हणाले.

ॲड. निकम म्हणाले, हा केवळ रमेश महाले यांचा सत्कार नाही तर तमाम पोलिस बांधवांचा सत्कार आहे. महाले यांच्यासारखे कर्तबगार आणि प्रामाणिक लोक पोलिस दलाला हवे आहेत. पोलिस दलात अनिष्ट प्रथा आहेत. ज्यावेळी राजकीय स्थित्यंतरे होतात, तेव्हा कुणाचे ऐकायचे? असा प्रश्न पोलिसांना पडतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी

कारागृहात असताना कसाबला बिर्याणी दिली जात होती, यावरून पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. पण बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी होती, असा खुलासा ॲड. निकम यांनी केला. मीच मीडियाला हे सांगितले होते आणि त्यांनी त्याची ब्रेकिंग न्यूज बनवली होती. राजकीय नेत्यांनी गोबेल्स प्रचार केला होता. मीडियाला कसे टॅकल करायचे, त्याचा तो भाग होता, असे निकम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्ला