शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Ajmal Kasab: ...तर कदाचित कसाबला २०२२ नंतरच फाशी झाली असती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:14 IST

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रमेश महाले यांना ‘कै. वसंतराव ढुमणे कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले...

पुणे : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याला पाहिल्यावर हा छोटा मुलगा काय गोळीबार करणार? असे वाटले होते. तोवर जनतेने त्याला मारून त्याचा हनुमान केला होता. साहेब, मी बिल्डरकडे बॉडीगार्ड आहे. फायरिंग सुरू झाल्यावर मी लपलो... हे कसाबने सांगितल्यावर मला त्याच्या सांगण्यात तथ्य वाटले. हा खरा अतिरेकी नाही, असे वाटले होते. सत्र न्यायालयात केस उभी राहिली तेव्हा त्याने माझी केस इथे चालवू नका, मी बालगुन्हेगार असल्याचा दावा केला. त्यावर न्यायालय म्हणाले, ‘कसाब उभे राहा.’ तेव्हा हा बालगुन्हेगार नाही, मोठा आहे असे सांगून त्याचा बचाव न्यायालयाने फेटाळला. त्यावेळी सरकारी वकिलांनी कसाबची संपूर्ण चौकशी करण्याचा अर्ज केला. पाच साक्षीदारांना तपासले. ती चौकशी जर झाली नसती तर कदाचित त्याला २०२२ नंतरच फाशी झाली असती, असा खुलासा मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी केला.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रमेश महाले यांना ‘कै. वसंतराव ढुमणे कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यानंतर राजेश दामले यांनी महाले यांची मुलाखत घेतली. त्यावेळी महाले यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण थरार कथन केला. यावेळी अजय ढुमणे, सोहनलाल सोनिगरा आणि नीलेश सोनिगरा उपस्थित होते.

अनेकदा पोलिस तपास करतात. मात्र, न्यायालयात त्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण होत नाही, अशी खंत व्यक्त करताना महाले म्हणाले, पाकिस्तान पुरस्कृत अनेक हल्ले हे २०१८ पूर्वी झाले आहेत. पण पाकिस्तानने ते हल्ले केल्याचे कधी मान्य केले नव्हते. पण आम्हाला जो पुरावा मिळाला त्यात पाकिस्तानने हा कट आमच्या देशात रचला गेला, हे मान्य केले. आम्ही न्यायालयीनदृष्ट्या हे सिद्ध केले. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदारांना असे वाटत होते की, आम्ही साक्ष दिली तर दाऊद इब्राहिमचे लोक आम्हाला मारतील. पण आम्ही लोकांना विश्वासात घेतले. हा खटला चार वर्षे चालला पण एकही साक्षीदार फितूर झाला नाही.

मुंबई किनारपट्टीवर दहशतवादी हल्ला होणार आहे, याची पूर्वकल्पना देण्यात आली असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले का? असे विचारले असता ते म्हणाले, समुद्र अथांग आहे. हल्ला होणार, असे रिपोर्ट येतच असतात. अनेकदा खोटी माहितीही दिली जाते. खरंतर खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाईसाठी कडक कायदा पाहिजे. खोटी माहिती देणाऱ्याला कमीत कमी १८ दिवस पोलिस कोठडीत ठेवायला हवे, असेही महाले म्हणाले.

ॲड. निकम म्हणाले, हा केवळ रमेश महाले यांचा सत्कार नाही तर तमाम पोलिस बांधवांचा सत्कार आहे. महाले यांच्यासारखे कर्तबगार आणि प्रामाणिक लोक पोलिस दलाला हवे आहेत. पोलिस दलात अनिष्ट प्रथा आहेत. ज्यावेळी राजकीय स्थित्यंतरे होतात, तेव्हा कुणाचे ऐकायचे? असा प्रश्न पोलिसांना पडतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी

कारागृहात असताना कसाबला बिर्याणी दिली जात होती, यावरून पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. पण बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी होती, असा खुलासा ॲड. निकम यांनी केला. मीच मीडियाला हे सांगितले होते आणि त्यांनी त्याची ब्रेकिंग न्यूज बनवली होती. राजकीय नेत्यांनी गोबेल्स प्रचार केला होता. मीडियाला कसे टॅकल करायचे, त्याचा तो भाग होता, असे निकम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्ला