शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

Ajmal Kasab: ...तर कदाचित कसाबला २०२२ नंतरच फाशी झाली असती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:14 IST

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रमेश महाले यांना ‘कै. वसंतराव ढुमणे कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले...

पुणे : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याला पाहिल्यावर हा छोटा मुलगा काय गोळीबार करणार? असे वाटले होते. तोवर जनतेने त्याला मारून त्याचा हनुमान केला होता. साहेब, मी बिल्डरकडे बॉडीगार्ड आहे. फायरिंग सुरू झाल्यावर मी लपलो... हे कसाबने सांगितल्यावर मला त्याच्या सांगण्यात तथ्य वाटले. हा खरा अतिरेकी नाही, असे वाटले होते. सत्र न्यायालयात केस उभी राहिली तेव्हा त्याने माझी केस इथे चालवू नका, मी बालगुन्हेगार असल्याचा दावा केला. त्यावर न्यायालय म्हणाले, ‘कसाब उभे राहा.’ तेव्हा हा बालगुन्हेगार नाही, मोठा आहे असे सांगून त्याचा बचाव न्यायालयाने फेटाळला. त्यावेळी सरकारी वकिलांनी कसाबची संपूर्ण चौकशी करण्याचा अर्ज केला. पाच साक्षीदारांना तपासले. ती चौकशी जर झाली नसती तर कदाचित त्याला २०२२ नंतरच फाशी झाली असती, असा खुलासा मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी केला.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रमेश महाले यांना ‘कै. वसंतराव ढुमणे कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यानंतर राजेश दामले यांनी महाले यांची मुलाखत घेतली. त्यावेळी महाले यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण थरार कथन केला. यावेळी अजय ढुमणे, सोहनलाल सोनिगरा आणि नीलेश सोनिगरा उपस्थित होते.

अनेकदा पोलिस तपास करतात. मात्र, न्यायालयात त्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण होत नाही, अशी खंत व्यक्त करताना महाले म्हणाले, पाकिस्तान पुरस्कृत अनेक हल्ले हे २०१८ पूर्वी झाले आहेत. पण पाकिस्तानने ते हल्ले केल्याचे कधी मान्य केले नव्हते. पण आम्हाला जो पुरावा मिळाला त्यात पाकिस्तानने हा कट आमच्या देशात रचला गेला, हे मान्य केले. आम्ही न्यायालयीनदृष्ट्या हे सिद्ध केले. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदारांना असे वाटत होते की, आम्ही साक्ष दिली तर दाऊद इब्राहिमचे लोक आम्हाला मारतील. पण आम्ही लोकांना विश्वासात घेतले. हा खटला चार वर्षे चालला पण एकही साक्षीदार फितूर झाला नाही.

मुंबई किनारपट्टीवर दहशतवादी हल्ला होणार आहे, याची पूर्वकल्पना देण्यात आली असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले का? असे विचारले असता ते म्हणाले, समुद्र अथांग आहे. हल्ला होणार, असे रिपोर्ट येतच असतात. अनेकदा खोटी माहितीही दिली जाते. खरंतर खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाईसाठी कडक कायदा पाहिजे. खोटी माहिती देणाऱ्याला कमीत कमी १८ दिवस पोलिस कोठडीत ठेवायला हवे, असेही महाले म्हणाले.

ॲड. निकम म्हणाले, हा केवळ रमेश महाले यांचा सत्कार नाही तर तमाम पोलिस बांधवांचा सत्कार आहे. महाले यांच्यासारखे कर्तबगार आणि प्रामाणिक लोक पोलिस दलाला हवे आहेत. पोलिस दलात अनिष्ट प्रथा आहेत. ज्यावेळी राजकीय स्थित्यंतरे होतात, तेव्हा कुणाचे ऐकायचे? असा प्रश्न पोलिसांना पडतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी

कारागृहात असताना कसाबला बिर्याणी दिली जात होती, यावरून पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. पण बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी होती, असा खुलासा ॲड. निकम यांनी केला. मीच मीडियाला हे सांगितले होते आणि त्यांनी त्याची ब्रेकिंग न्यूज बनवली होती. राजकीय नेत्यांनी गोबेल्स प्रचार केला होता. मीडियाला कसे टॅकल करायचे, त्याचा तो भाग होता, असे निकम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्ला