शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली! खडकवासला साखळीतील चारही धरणे ‘फुल्ल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 09:55 IST

चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ओव्हरफ्लाे झाली आहेत. यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची व ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदाच्या हंगामात प्रथम १२ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के भरले हाेते. त्यानंतर पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला धरण साखळी मधील टेमघर धरण १६ ऑगस्टला ९५ टक्के भरले आहे. या चारही धरणांमधील पाणीसाठा २८.९७ टीएमसी अर्थात ९९.३७ टक्के झाला आहे.दरम्यान, मंगळवारी दिवसभरात टेमघर धरण परिसरात २५ मिमी, वरसगाव १६, पानशेत १७, तर खडकवासला धरण क्षेत्रात १ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. चारही धरणे जवळपास १०० टक्के भरल्याने खडकवासला धरणातून ४,७०८ तर पानशेत धरणातून १,९५४ क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.

धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा

जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शहरात पाणीकपात सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर जुलैत चांगल्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे १४ जुलैला खडकवासला धरण १०० टक्के भरले. त्यानंतर ऑगस्टमध्ये ही दमदार पाऊस झाल्याने पानशेत व वरसगाव ही धरणे तुडुंब भरली. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली. आता टेमघर धरणही भरत आल्याने चारही धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणे पूर्ण भरल्याने ग्रामीण भागाच्या शेतीच्या सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गेल्या वर्षी चारही धरणांमध्ये एकूण २७.९५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. यंदा त्यापेक्षा एक टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. - योगेश भंडलकर, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊसDamधरण