शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली! खडकवासला साखळीतील चारही धरणे ‘फुल्ल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 09:55 IST

चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ओव्हरफ्लाे झाली आहेत. यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची व ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदाच्या हंगामात प्रथम १२ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के भरले हाेते. त्यानंतर पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला धरण साखळी मधील टेमघर धरण १६ ऑगस्टला ९५ टक्के भरले आहे. या चारही धरणांमधील पाणीसाठा २८.९७ टीएमसी अर्थात ९९.३७ टक्के झाला आहे.दरम्यान, मंगळवारी दिवसभरात टेमघर धरण परिसरात २५ मिमी, वरसगाव १६, पानशेत १७, तर खडकवासला धरण क्षेत्रात १ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. चारही धरणे जवळपास १०० टक्के भरल्याने खडकवासला धरणातून ४,७०८ तर पानशेत धरणातून १,९५४ क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.

धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा

जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शहरात पाणीकपात सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर जुलैत चांगल्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे १४ जुलैला खडकवासला धरण १०० टक्के भरले. त्यानंतर ऑगस्टमध्ये ही दमदार पाऊस झाल्याने पानशेत व वरसगाव ही धरणे तुडुंब भरली. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली. आता टेमघर धरणही भरत आल्याने चारही धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणे पूर्ण भरल्याने ग्रामीण भागाच्या शेतीच्या सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गेल्या वर्षी चारही धरणांमध्ये एकूण २७.९५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. यंदा त्यापेक्षा एक टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. - योगेश भंडलकर, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊसDamधरण