शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अखेर वरुणराजा बरसला! पुण्यातील चारही धरणात ६ दिवसात २१ टक्क्यांनी पाणी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:30 IST

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो

पुणे : दरवर्षी जून महिन्याच्या १५ तारखेनंतर पावसाला सुरुवात होते. पण यंदा जून संपत आला तरी पाऊस पडला नाही. संपूर्ण राज्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. आषाढी वारीतही वारकऱ्यांकडून पावसासाठी पांडुरंगाला साकडे घालण्यात आले. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पुणे शहरातही खबरदारी म्ह्णून पावसाअभावी पाणी कपात करण्यात आली. जुलैच्या ४ तारखेला शहरात एक दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुण्यातील चारही धरणात सहा दिवसात तब्बल २१ टक्क्यांनी पाणी वाढले आहे. सतत होणाऱ्या पावसाने पुणे महापालिकेकडून पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चार तारखेला चारही धरणे मिळून 3.35 टीएमसी आणि 11.50 टक्के पाणीसाठा होता. आजच्या तारखेला 9.47 टीएमसी आणि 32.48 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच सहा दिवसात ६ टीएमसी आणि २१ टक्के पाणी वाढले आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरण ७५ टक्के भरले असून पानशेत ३२. ४१ टक्के, वरसगाव ३० टक्के, टेमघर १८.२९ टक्के भरले आहे. असाच पाऊस सातत्याने पडत राहिला तर खडकवासला लवकरच १०० टक्के भरून जाईल असा अंदाज पाणी विभागाकडून केला जात आहे. 

शहरात संततधार पाऊस  

पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. सर्वत्र गार वातावरण झाले आहे. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने दिसून आले आहे. अनेक भागात वाहतूककोंडीला नागरिक सामोरे जात आहेत. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने अनेक भागात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी झाडपडीच्या घटनाही झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

आरोग्याची काळजी घ्यावी 

शहरात होणाऱ्या संततधार पावसाने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल, डेंग्यू, मलेरिया असे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच गरम पाणी प्यावे, त्रास झाल्यास अंगावर काढू नये, आहाराकडे लक्ष द्यावे ते डॉक्टरांकडून आवाहन करण्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाDamधरणWaterपाणीRainपाऊस