शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ३ बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 16:24 IST

तिन्ही चिमुरड्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली

चाकण : खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन सख्या बहीण भावांचा घराजवळील शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खे तालुक्यातील आंबेठाण येथे घडली आहे. ही तिन्ही चिमुरडी मुले अवघ्या ८ ते ४ वर्षांची होती. या तिन्ही चिमुरड्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित जयकिशन दास ( वय.८ वर्षे), राकेश जयकीसन दास ( वय.६ वर्षे )आणि श्वेता जयकीसन दास ( वय.४ वर्षे ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. जयकीसन दास ( मूळ रा.बिहार,सध्या रा.आंबेठाण, ता.खेड ) यांची ही तिन्ही मुले आहेत. जयकीसन दास हा पेंटरची कामे करत आहे. दास हा आपल्या कुटुंबासह आंबेठाण येथील लांडगे वस्ती येथे भाड्याच्या खोलीत राहत आहे.

लांडगे वस्तीजवळील शेतात मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याने खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे.ही तिन्ही बहीण भावंडे घराजवळ खेळत असताना ती या खड्ड्याकडे गेली.मुले खेळण्यासाठी पाण्यात उतरली मात्र खेळताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय.सी.एम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.

टॅग्स :KhedखेडWaterपाणीDamधरणDeathमृत्यू