शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 12:40 IST

या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, फक्त आरक्षणाच राजकारण करायचंय

पुणे: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण... मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मागच्या वर्षीपासून आंदोलन पुकारलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत पदयात्रा काढली आहे. लाखोंचा जमाव घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या सरकारला आरक्षण द्यायचं नाही. ते मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत आहेत असा आरोप पटोले यांनी केले आहे.  

पटोले म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे सरकारचं पाप आहे. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सांगत होते की, राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत त्यांनी करावं. आता का देत नाहीत मराठा समाजाला आरक्षण? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यायचच नाहीये. तुमच्या कडे पाशवी बहुमत आहे. तरीही का देत नाही आरक्षण? हे केवळ आरक्षणाच राजकारण करत असल्याचे असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे. 

हे येड्यांचं सरकार 

आरक्षणाचा प्रश तातडीने सोडवावा. आज जनगणना केली जात नाही. हे मुद्दाम जनगणना करत नाहीत. तुम्हाला गरिबांच काहीच पडलं नाही. काल राम मंदिर सोहळ्याला देखील सगळे श्रीमंत लोक होते. राम तर गरिबांचा होता. हे लोकांना येड समजतात. हे येड्यांचं सरकार आहे. मराठा आणि ओबीसी वाद हे निर्माण करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेMaratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील