शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालखी येण्याच्या मार्गावरच्या रस्त्याची दुरवस्था, चारवेळा भूमिपूजनाचे नारळ फुटले, काम सुरू झालेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:06 IST

- किमान चार वेळा कामाचा केवळ प्रारंभ झालेल्या या ४०० फूट रस्त्याची पालखीपूर्वी तरी डागडुजी होणार की नाही? त्या भागात रोगराईला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न त्या भागातील रहिवाशांच्या मनाला भेडसावतो आहे.

इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ज्या रस्त्याने इंदापुरात येते व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जाते, त्या इंदापूर-बारामती राज्यरस्त्यालगत असणाऱ्या शेंडे मळा भागातील रस्त्याची पावसाच्या पाण्यामुळे कमालीची दुरवस्था झाली आहे.

आत्तापर्यंत किमान चार वेळा कामाचा केवळ प्रारंभ झालेल्या या ४०० फूट रस्त्याची पालखीपूर्वी तरी डागडुजी होणार की नाही? त्या भागात रोगराईला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न त्या भागातील रहिवाशांच्या मनाला भेडसावतो आहे.

इंदापूर-बारामती राज्यरस्त्यालगत श्रीराम वेशीसमोर काही फूट अंतरावर शेंडेमळा आहे. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळापासून बारामती राज्यरस्त्यापासून शेंडेमळ्यात जाणारा रस्ता वहिवाटीमध्ये आहे. या भागात बऱ्याच अपार्टमेंट झाल्या. एकूण ४०० लोक त्या भागात राहतात. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या वेळी दहा ते पंधरा दिंड्या शेंडेमळ्यात उतरतात. सुमारे ५० गाड्यांतील दोन हजार लोक तेथे मुक्कामास असतात.

शेंडेमळ्यातील हा रहदारीचा रस्ता अद्यापपर्यंत कच्चाच राहिला आहे. कोणतीही निवडणूक आली की, या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ फुटतो. त्या निवडणुकीच्या निकालानंतर फुटलेल्या नारळाचे कवचच काय, तो फोडणारे नेतेगणदेखील त्यानंतर नजरेला पडत नाहीत. आत्तापर्यंत चार वेळा असा प्रकार घडलेला आहे. त्याला कंटाळून अपरिहार्यता झाल्याने स्थानिक लोकांनी आजपर्यंत स्वखर्चाने त्या रस्त्याची सुधारणा केली आहे.

दोन-अडीच महिन्यांपूर्वी जलवाहिनी टाकण्याच्या नावाखाली नगरपरिषदेने तो रस्ता खोदला. काम झाल्यानंतर लावलिजाव करत बुजवला. मे महिन्याच्या शेवटी पडलेल्या मुसळधार पावसाने तकलादू स्वरूपात बुजवण्यात आलेल्या रस्त्याची पार शकले करून टाकली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक पावसात दुरवस्थेत भरच पडत चाललेली आहे. शेंडेमळ्याच्या वरच्या भागात भर टाकून व्यवस्थित रस्ता बनवण्यात आला आहे. शेंडेमळ्यातील रस्त्याच्या नशिबी मात्र वनवासच लिहिला गेला आहे. रस्त्याची ही कथा आहे. त्याखेरीज या भागात सांडपाणी वाहून नेण्याची सोयही करण्यात आलेली नाही. एका अपार्टमेंटच्या बाजूला हे सारे सांडपाणी साठून राहिलेले आहे. त्यामध्ये डुकरे स्वच्छंदपणे डुंबताना नजरेस पडणे नेहमीचे झाले आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पाचवीला पुजलेली आहे.

येत्या १५ दिवसांमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्या पालखीतील वारकऱ्यांना या ओंगळवाण्या रस्त्याचे दर्शन घेऊन रिंगण सोहळ्यासाठी जावे लागणार आहे. इंदापुरातून पंढरपूरकडे प्रस्थान करताना, डॉ. आंबेडकरनगर भागातून अकलूज रस्त्याकडे जावे लागते. त्या रस्त्याच्या दुतर्फा अस्वच्छता व दुर्गंधी असल्यामुळे पालखीच्या विश्वस्तांनी या रस्त्याने जाणार नाही, त्यासाठी मुक्कामाला इंदापुरात येणार नाही, असा पवित्रा मध्यंतरीच्या काळात घेतला होता. नगरपरिषदेला ‘त्या’ रस्त्याच्या दुतर्फा आच्छादन करून व सुगंधी द्रव्ये फवारून पालखी प्रस्थानाची सोय करावी लागली होती; पण शेंडेमळा व त्याचा रस्ता पालखी येण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर पालखी आगमनापूर्वी तरी नगरपरिषद या रस्त्याची किमान डागडुजी करून सांडपाणी व्यवस्थापनाची सोय करेल का, असा प्रश्न स्थानिकांच्या मनाला भेडसावतो आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी