शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 18:44 IST

सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या

पुणे : जलसंधारणासह आरोग्य, शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर कडक ताशेरे ओढत राजकारणाचा स्तर घसरल्याची खंत व्यक्त केली. सत्ताधारी व विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे असून त्यांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नाम फाउंडेशनच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात सर्वच राजकीय पक्षांनी जलसंधारणाच्या कामात मदत केल्याचे स्पष्ट केले. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याचे सांगत, सर्वच पक्षांमध्ये माझे मित्र असल्याचे पाटेकर यांनी यावेळी सांगितले. मात्र, सध्या राजकारणाचा स्तर खालावला असल्याची खंत व्यक्त करत पूर्वीचे राजकारणाचे दिवस छान होते, ते आता का नाहीत, असा सवाल केला. सत्ताधारी व विरोधक यांचे नाते जीभ व दात असे असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या. ज्या दिवशी हे साध्य होईल, त्या दिवशी राजकारणाचा स्तर उंचावलेला असेल असेही ते सांगण्यासही ते विसरले नाहीत. सध्याच्या राजकारणाच्या स्तरावर मनात कायमच किंतु-परंतु असतो, असे ते म्हणाले.

वैयक्तिक आयुष्यात अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. मात्र, नाम फाउंडेशनमध्ये काम केल्यानंतर जे समाधान मिळते त्यासारखा मोठा सन्मान नाही, अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. रात्री झोपताना असणारा आनंद हा वेगळाच असून आपल्या कामामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आले याचे समाधान असल्याचे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNana Patekarनाना पाटेकरPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस