शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डाळीचे उत्पादन ३५ तर तृणधान्यांचे १८ टक्क्यांनी घटणार, कृषी विभागाचा अंदाज

By नितीन चौधरी | Updated: October 11, 2023 15:34 IST

खरिपात सर्वाधिक ५० लाख हेक्टरवर लागवड असलेल्या सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत २१ लाख टनांनी घटण्याचा अंदाज

पुणे : राज्यात यंदा उशीरा आलेल्या पावसामुळे व त्यानंतरच्या खंडामुळे तृणधान्यांचे उत्पादन १८ टक्क्यांनी कमी होणार आहे. तर डाळींच्या उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट होणार आहे. खरिपात सर्वाधिक ५० लाख हेक्टरवर लागवड असलेल्या सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत २१ लाख टनांनी घटण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने दिलेल्या पहिल्या नजर अंदाजात ही आकडेवारी देण्यात आली आहे.

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले परिणामी मुगाचे पेरणी क्षेत्र सरासरीच्या ५४ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी यंदा मुगाचे उत्पादन केवळ ६० हजार टन होण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन तब्बल ६६ टक्क्यांनी कमी आहे. उडदाची पेरणी सरासरीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी कमी झाली. परिणामी, यंदा केवळ ८७ हजार टन उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन २ लाख २६ हजार टन इतके झाले होते. सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे.

तुरीचे उत्पादन ३० टक्के कमी

तुरीची लागवड यंदा ११ लाख १३ हजार हेक्टरवर झाली. सरासरी लागवड क्षेत्राच्या तुलनेत यंदा १४ टक्क्यांनी यात घट दर्शविण्यात आली आहे. यंदा तुरीचे उत्पादन ८ लाख ७६ हजार टन उत्पादन अपेक्षित असून गेल्या वर्षी हेच उत्पादन ९ लाख २६ हजार टन इतके होते. सरासरीच्या तुलनेत यंदा उत्पादनात ३० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे.

भात उत्पादनात मात्रस वाढ

यंदा भाताचे ३४ लाख ४८ हजार टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये १३ टक्क्यांची वाढ होईल. खरीप ज्वारीचे उत्पादन ९१ हजार टन इतके अपेक्षित असून सरासरीच्या तुलनेत त्यात ६७ टक्क्यांची घट होईल. बाजरीचे उत्पादन २ लाख टन येण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या तुलनेत यात ६६ टक्क्यांची घट होईल. मक्याच्या उत्पादनातही सरासरीच्या तुलनेत ४१ टक्क्यांची घट होईल असा अंदाज आहे. यंदा मक्याचे उत्पादन १३ लाख ५८ हजार टन अपेक्षित असून गेल्या वर्षी हेच उत्पादन २७ लाख १२ हजार टन इतके झाले होते.सोयाबीन २१ लाख टनांनी कमी, कापूसही कमी पिकणार

राज्यात यंदा सोयाबीनची लागवड ५० लाख ५४ हजार हेक्टरवर झाली आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, या पिकाला पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचे दिसून येत आहे. यंदा ४५ लाख ७३ हजार टन इतके उत्पादन अपेक्षित असून गेल्या वर्षी हेच उत्पादन ६६ लाख ५ हजार टन इतके झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २१ लाख टनांनी उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत यंदाचे उत्पादन केवळ ६ टक्क्यांनी घटणार आहे. कापसाचे क्षेत्र ४२ लाख २२ हजार हेक्टर इतके असून उत्पादन ७५ लाख ७३ हजार गाठी होण्याची शक्यता असून गेल्या वर्षी हेच उत्पादन ८४ लाख १३ हजार गाठी झाल्या होत्या. सरासरीच्या तुलनेत कापसाचे उत्पादन चार टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

यांना मॉन्सूनचे आगमन उशिराने झाले. त्यातच ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडला. याच काळात अनेक पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्याने पावसाच्या खंडामुळे उत्पादकता व उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. - विनय आवटे, सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे

टॅग्स :PuneपुणेMarketबाजारfoodअन्नSocialसामाजिकMONEYपैसा