शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अवकाळीचे पंचनामे अपूर्णच; अजून किती दिवस बळीराजानं वाट बघावी

By नितीन चौधरी | Updated: December 26, 2023 10:50 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड

पुणे : राज्यात नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पंचनामे केव्हा पूर्ण होतील आणि मदत केव्हा मिळेल, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार पंचनाम्यांचे काम सुमारे ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

राज्यात २४ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे कोकण वगळता बहुतांश जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार ७ लाख ८८ हजार १०१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मदत पुनर्वसन विभागाने कृषी विभागाला दिले. पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम आकडा निश्चित झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वाधिक नुकसान बुलढाण्यात

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वाधिक १ लाख २८ हजार २०१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झाले आहे. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार ४३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर अमरावती जिल्ह्यातही १ लाख १५ हजार ४९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर

दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता १७५७ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून, त्यापैकी ३०० कोटींपेक्षा जास्तीचे वाटपदेखील झाले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार एकूण बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ठाणे ९१, पालघर १५८९, रत्नागिरी ८८, सिंधुदुर्ग १, नाशिक ३३३८८, धुळे २९४, नंदुरबार २८८७, जळगाव ९०५, नगर १५३०७, पुणे ७८६४, सोलापूर २९७७६, सातारा १५, सांगली १६५५९, छत्रपती संभाजीनगर ४५७८३, जालना ७६८०३, बीड २१५, धाराशिव २०६८, हिंगोली ७९४०२, परभणी १०००, नांदेड ३००३, लातूर २४६, बुलढाणा १२८२०१, अकोला ६३८६१, वाशिम ९९६१, यवतमाळ १२६४३८, अमरावती ११५०४९, गडचिरोली ३०, वर्धा ५८३, नागपूर १९७६, भंडारा ८६०८, गोंदिया २७७५, चंद्रपूर १३३३५ एकूण ७८८१०१.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदेRainपाऊसMONEYपैसा