शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

राज्यातील अवकाळीचे पंचनामे अपूर्णच; अजून किती दिवस बळीराजानं वाट बघावी

By नितीन चौधरी | Updated: December 26, 2023 10:50 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड

पुणे : राज्यात नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पंचनामे केव्हा पूर्ण होतील आणि मदत केव्हा मिळेल, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार पंचनाम्यांचे काम सुमारे ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

राज्यात २४ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे कोकण वगळता बहुतांश जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार ७ लाख ८८ हजार १०१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मदत पुनर्वसन विभागाने कृषी विभागाला दिले. पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम आकडा निश्चित झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वाधिक नुकसान बुलढाण्यात

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वाधिक १ लाख २८ हजार २०१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झाले आहे. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार ४३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर अमरावती जिल्ह्यातही १ लाख १५ हजार ४९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर

दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता १७५७ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून, त्यापैकी ३०० कोटींपेक्षा जास्तीचे वाटपदेखील झाले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार एकूण बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ठाणे ९१, पालघर १५८९, रत्नागिरी ८८, सिंधुदुर्ग १, नाशिक ३३३८८, धुळे २९४, नंदुरबार २८८७, जळगाव ९०५, नगर १५३०७, पुणे ७८६४, सोलापूर २९७७६, सातारा १५, सांगली १६५५९, छत्रपती संभाजीनगर ४५७८३, जालना ७६८०३, बीड २१५, धाराशिव २०६८, हिंगोली ७९४०२, परभणी १०००, नांदेड ३००३, लातूर २४६, बुलढाणा १२८२०१, अकोला ६३८६१, वाशिम ९९६१, यवतमाळ १२६४३८, अमरावती ११५०४९, गडचिरोली ३०, वर्धा ५८३, नागपूर १९७६, भंडारा ८६०८, गोंदिया २७७५, चंद्रपूर १३३३५ एकूण ७८८१०१.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदेRainपाऊसMONEYपैसा