शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार

By राजू इनामदार | Updated: June 6, 2023 15:16 IST

भाजप पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार करतंय, काँगेसचा आरोप

पुणे: मेट्रो चे थाटात उदघाटन केले, मात्र आता त्याला वर्ष होऊन गेले तरीही मेट्रोची धाव एक इंचही पुढे गेलेली नाही. या विलंबाला भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेतेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला. सरकारमध्ये नियोजनाचा अभाव असल्यानेच हे होत असून हा तर पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

मागील वर्षी ६ मार्चला पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे या ५ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी मेट्रोचे अधिकारी आत्ताच उदघाटन नको असे सांगत असतानाही महापालिका निवडणूक जाहीर होईल या शक्यतेने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी उदघाटनाचा घाट घातला अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. त्यानंतर वर्ष झाले, आताचा मार्चही गेला पण अद्याप गरवारे महाविद्यालयाच्या पुढील मेट्रो मार्ग सुरू झालेला नाही. उलट वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील ५ स्थानकांचे काम अजूनही अपूरेच आहे. लिफ्टसह अनेक कामे अजूनही सुरूच असल्याचे जोशी म्हणाले.

यामुळे मेट्रो मार्गाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावरील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. सलग ४ वर्षे हे काम सुरू आहे. आतापर्यंत काम पूर्ण होऊन संपूर्ण मेट्रो स्थानकांसहित सुरू होणे गरजेचे होते. कोरोनाचा ८ महिन्यांचा कालावधी जमेस धरला तरीही मेट्रोच्या कामाला विलंबच होत आहे. पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी हा एक प्रकारचा खेळच आहे व स्थानिक भाजप पदाधिकारी तो करत आहे असा आरोप जोशी यांनी केला.मेट्रो त्वरीत पूर्ण क्षमतेने, संपूर्ण मार्गावर सुरू होणे ही पुण्याची आजची सर्वात महत्वाची गरज आहे. मात्र परत एकदा भव्य उदघाटन करण्याचा स्थानिक भाजपचा विचार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची धडपड पुणेकरांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांकडेच तक्रार करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. वनाज ते गरवारे हा मेट्रो मार्ग सुरू करण्याची घाई केली त्याप्रमाणेच आता संपूर्ण मेट्रो मार्गही तत्काळ सुरू करावा, उदघाटनाच्या फंदात पडू नये अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीBJPभाजपाcongressकाँग्रेस