शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 19:35 IST

या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालव्याला भगदाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि याच दबावामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झालाय काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. 

यामुळे कालव्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कालव्याला भगदाड; सर्वत्र पाणीच पाणी…

निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच गेल्या काही तासांपासून बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. पिंपळी लिमटेक परिसरात कालव्याच्या काठाला भगदाड पडल्याने पाणी बाहेर पडले आणि आसपासच्या शेतजमिनी आणि घरांमध्ये शिरले. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.कालव्याचे पाणी वेगाने आले, काही कळायच्या आतच शेतात आणि घरात पाणी शिरले. यात  बरेच नुकसान झाले आहे. अशी माहिती स्थानिकांनी दिली. lनागरिकांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

जलसंपदा विभागाची कारवाई

पिंपळी लिमटेक येथे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तात्काळ कारवाईला सुरुवात केली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी निरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, भगदाड दुरुस्त करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. 

“सध्या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. नदीपात्र आणि कालव्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे शिंदे यांनी नमूद केले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सुचवले आहे.

नागरिकांचे नुकसान; मदतीची गरज

कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीWaterपाणीRainपाऊस