शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 19:35 IST

या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालव्याला भगदाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि याच दबावामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झालाय काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. 

यामुळे कालव्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कालव्याला भगदाड; सर्वत्र पाणीच पाणी…

निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच गेल्या काही तासांपासून बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. पिंपळी लिमटेक परिसरात कालव्याच्या काठाला भगदाड पडल्याने पाणी बाहेर पडले आणि आसपासच्या शेतजमिनी आणि घरांमध्ये शिरले. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.कालव्याचे पाणी वेगाने आले, काही कळायच्या आतच शेतात आणि घरात पाणी शिरले. यात  बरेच नुकसान झाले आहे. अशी माहिती स्थानिकांनी दिली. lनागरिकांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

जलसंपदा विभागाची कारवाई

पिंपळी लिमटेक येथे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तात्काळ कारवाईला सुरुवात केली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी निरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, भगदाड दुरुस्त करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. 

“सध्या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. नदीपात्र आणि कालव्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे शिंदे यांनी नमूद केले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सुचवले आहे.

नागरिकांचे नुकसान; मदतीची गरज

कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीWaterपाणीRainपाऊस