शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 19:35 IST

या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालव्याला भगदाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि याच दबावामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झालाय काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. 

यामुळे कालव्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कालव्याला भगदाड; सर्वत्र पाणीच पाणी…

निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच गेल्या काही तासांपासून बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. पिंपळी लिमटेक परिसरात कालव्याच्या काठाला भगदाड पडल्याने पाणी बाहेर पडले आणि आसपासच्या शेतजमिनी आणि घरांमध्ये शिरले. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.कालव्याचे पाणी वेगाने आले, काही कळायच्या आतच शेतात आणि घरात पाणी शिरले. यात  बरेच नुकसान झाले आहे. अशी माहिती स्थानिकांनी दिली. lनागरिकांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

जलसंपदा विभागाची कारवाई

पिंपळी लिमटेक येथे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तात्काळ कारवाईला सुरुवात केली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी निरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, भगदाड दुरुस्त करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. 

“सध्या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. नदीपात्र आणि कालव्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे शिंदे यांनी नमूद केले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सुचवले आहे.

नागरिकांचे नुकसान; मदतीची गरज

कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीWaterपाणीRainपाऊस