शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

नाचणीच्या पिकासाठी आता जळणार नाहीत डोंगर; वेल्हे तालुक्यातील डोंगर खाक होण्यापासून वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:02 IST

वेल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांचा पुढाकार; स्वयंसेवी संस्थेकडून धान्याची मदत

श्रीकिशन काळे

पुणे : दुर्गम भागातील डोंगरावर नाचणीचे पीक घेऊन पोटाची खळगी भरली जाते. पण त्या नाचणीच्या पिकासाठी डोंगराला जाळावे लागते. ज्यामध्ये जैवविविधता नष्ट होते. यावर उपाय म्हणून त्या दुर्गम भागातील लोकांना जर पोटासाठी धान्य दिले, तर ते डोंगर जाळणार नाहीत. त्यासाठी टेल्स ऑर्गनायझेशनने यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्यातील काही डोंगर खाक होण्यापासून वाचले आहेत.

वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागात नाचणी घेताना डोंगरास आग लावतात. काही मिनिटांत सह्याद्रीच्या डोंगरांची राखरांगोळी होते. तसेच मोठं प्रदूषणही होतं. केवळ नाईलाज असतो म्हणून नाचणी पीक घेण्याकरिता डोंगर पेटवले जातात. सह्याद्री कसा वाचवता येईल ? याच करिता एक खारीचा वाटा म्हणून टेल्स संस्थेच्या लोकेश बापट आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेत गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून डिगी वस्ती, खानू गावातील कुटुंबास आठ ते दहा किलो नाचणी, गूळ देण्यास सुरुवात केली.

आठ महिन्यांपासून जनजागृती

गावातील २५ ते २७ कुटुंबाला धान्य देण्याचे काम संस्थेमार्फत होत आहे. याचा परिणाम म्हणजे या गावातील लोकांनी गेल्या आठ-दहा महिन्यांत डोंगर जंगलास हात लावला नाही. समाजातील अनेक घटक, मोठ्या एनजीओ, सीएसआरसारख्या माध्यमांद्वारे एकत्रित आले पाहिजे. दुर्गम गावे, वस्त्या दत्तक घेऊन जनजागृती केली, तर मोठ्या प्रमाणावर डोंगराला आग लावण्याचे प्रमाण कमी होऊन जैवविविधता वाचणार आहे, असे लोकेश बापट यांनी सांगितले.

का पेटवतात डोंगर ?

डोंगराळ, दुर्गम भागात धान्य पिकवण्याजोग्या सपाट शेतजमिनी नसतात. त्यांना उपजीविकेसाठी डोंगर जाळून नाचणीचे पीक घ्यावे लागते. या ‘शिफ्टिंग कल्टिवेशन, झूम, स्लॅश ॲन्ड बर्न’ पद्धतीत उंच वाढलेली झाडे हिवाळ्यात बुंध्यापाशी तोडून त्यांचा पसारा उतारावर पाडला जातो. कडक उन्हाळ्यात खोड, फांद्या, पाने वाळल्यानंतर डोंगर उतार खालून वर पेटवला जातो. नंतरच्या पावसाळ्यात तुटपुंज्या सपाट जमिनीवर नाचणीची रोपे केली जातात. ती हातभर उंच झाल्यावर उपटून, जळून भिजलेल्या डोंगरावर पेरली जातात. दिवाळीनंतर नाचणीच्या पिकाची कापणी करून ते खाली आणतात, वाळवतात आणि झोडतात. अशा धोकादायक खडतर कष्टांनंतर दोन पाच पोती नाचणी मिळते. वर्षभरासाठी खायला लागते त्यापेक्षा जास्त मिळाली तर पाडीव भावाने (२० रु किलो) विकून व्यापाऱ्याकडून जेमतेम इतर किराणा घेण्याइतके पैसे त्या लोकांना मिळतात. हा प्रकार थांबला पाहिजे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांनी सांगितले आहे.

...तर जंगले पुन्हा हिरवी होतील

वृक्षप्रेमींनी आणि संस्थांनी दुर्गम भागात जाऊन या स्थानिकांना नाचणी शेतीपासून परावृत्त केले आणि त्यांना गरजेचे धान्य मोफत पुरवले, तर पाच-सात वर्षात ही जंगले पुन्हा हिरवी होतील. या लोकांच्या गरजा अगदी माफक आहेत हे त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात येईल.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीSocialसामाजिकFarmerशेतकरी