शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

नाचणीच्या पिकासाठी आता जळणार नाहीत डोंगर; वेल्हे तालुक्यातील डोंगर खाक होण्यापासून वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:02 IST

वेल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांचा पुढाकार; स्वयंसेवी संस्थेकडून धान्याची मदत

श्रीकिशन काळे

पुणे : दुर्गम भागातील डोंगरावर नाचणीचे पीक घेऊन पोटाची खळगी भरली जाते. पण त्या नाचणीच्या पिकासाठी डोंगराला जाळावे लागते. ज्यामध्ये जैवविविधता नष्ट होते. यावर उपाय म्हणून त्या दुर्गम भागातील लोकांना जर पोटासाठी धान्य दिले, तर ते डोंगर जाळणार नाहीत. त्यासाठी टेल्स ऑर्गनायझेशनने यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्यातील काही डोंगर खाक होण्यापासून वाचले आहेत.

वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागात नाचणी घेताना डोंगरास आग लावतात. काही मिनिटांत सह्याद्रीच्या डोंगरांची राखरांगोळी होते. तसेच मोठं प्रदूषणही होतं. केवळ नाईलाज असतो म्हणून नाचणी पीक घेण्याकरिता डोंगर पेटवले जातात. सह्याद्री कसा वाचवता येईल ? याच करिता एक खारीचा वाटा म्हणून टेल्स संस्थेच्या लोकेश बापट आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेत गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून डिगी वस्ती, खानू गावातील कुटुंबास आठ ते दहा किलो नाचणी, गूळ देण्यास सुरुवात केली.

आठ महिन्यांपासून जनजागृती

गावातील २५ ते २७ कुटुंबाला धान्य देण्याचे काम संस्थेमार्फत होत आहे. याचा परिणाम म्हणजे या गावातील लोकांनी गेल्या आठ-दहा महिन्यांत डोंगर जंगलास हात लावला नाही. समाजातील अनेक घटक, मोठ्या एनजीओ, सीएसआरसारख्या माध्यमांद्वारे एकत्रित आले पाहिजे. दुर्गम गावे, वस्त्या दत्तक घेऊन जनजागृती केली, तर मोठ्या प्रमाणावर डोंगराला आग लावण्याचे प्रमाण कमी होऊन जैवविविधता वाचणार आहे, असे लोकेश बापट यांनी सांगितले.

का पेटवतात डोंगर ?

डोंगराळ, दुर्गम भागात धान्य पिकवण्याजोग्या सपाट शेतजमिनी नसतात. त्यांना उपजीविकेसाठी डोंगर जाळून नाचणीचे पीक घ्यावे लागते. या ‘शिफ्टिंग कल्टिवेशन, झूम, स्लॅश ॲन्ड बर्न’ पद्धतीत उंच वाढलेली झाडे हिवाळ्यात बुंध्यापाशी तोडून त्यांचा पसारा उतारावर पाडला जातो. कडक उन्हाळ्यात खोड, फांद्या, पाने वाळल्यानंतर डोंगर उतार खालून वर पेटवला जातो. नंतरच्या पावसाळ्यात तुटपुंज्या सपाट जमिनीवर नाचणीची रोपे केली जातात. ती हातभर उंच झाल्यावर उपटून, जळून भिजलेल्या डोंगरावर पेरली जातात. दिवाळीनंतर नाचणीच्या पिकाची कापणी करून ते खाली आणतात, वाळवतात आणि झोडतात. अशा धोकादायक खडतर कष्टांनंतर दोन पाच पोती नाचणी मिळते. वर्षभरासाठी खायला लागते त्यापेक्षा जास्त मिळाली तर पाडीव भावाने (२० रु किलो) विकून व्यापाऱ्याकडून जेमतेम इतर किराणा घेण्याइतके पैसे त्या लोकांना मिळतात. हा प्रकार थांबला पाहिजे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांनी सांगितले आहे.

...तर जंगले पुन्हा हिरवी होतील

वृक्षप्रेमींनी आणि संस्थांनी दुर्गम भागात जाऊन या स्थानिकांना नाचणी शेतीपासून परावृत्त केले आणि त्यांना गरजेचे धान्य मोफत पुरवले, तर पाच-सात वर्षात ही जंगले पुन्हा हिरवी होतील. या लोकांच्या गरजा अगदी माफक आहेत हे त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात येईल.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीSocialसामाजिकFarmerशेतकरी