शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप

By राजू इनामदार | Updated: June 9, 2025 15:36 IST

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे, सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती

पुणे: पक्षीय बैठकीसाठी म्हणून सोमवारी पुण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मुंब्रा येथे आजच सकाळी झालेल्या लोकल अपघातावरूनरेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय यांच्याबरोबरच पत्रकारांवरही टीकास्त्र सोडले. परप्रातांमधून मुुंबईत जोर येऊन आदळणारे लोंढेच या सगळ्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचे मत त्यांना व्यक्त केले. रेल्वे प्रशासन,रेल्वे मंत्रालय व पत्रकारांवरही त्यांनी टिकास्त्र सोडले

मुंबईची लोकल चालते कशी हे जगाला आश्चर्यच असल्याचे उपरोधिकपणे सांगत त्यांनी राज उद्धव एकत्र कधी येणार या बातम्यांऐवजी या दुरवस्थेकडे थोडे लक्ष द्या असे पत्रकारांनाही सुनावले. आपण वारंवार शहराच्या दुरवस्थेविषयी बोलतो, मात्र त्याला कधीही महत्व दिले जात नाही. आम्ही एकत्र कधी येणार याच्या बातम्यांना जेवढा वेळ दिला तेवढा वेळ आता या अपघातात मृत्यूमूखी पडलेल्यांना देणार का असा प्रश्न राज यांनी केला.

रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत लोकलमध्ये लोक येतात कुठून जातात कुठून काहीही कळत नाही. याची व्यवस्था लावण्यासाठी मुंबईतील लोकांनी रेल्वे मंत्रालयाला एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करा असे सांगितले होते, त्याचे काय झाले कोणालाही माहिती नाही. मेट्रो बांधताहेत, पुल बांधताहेत, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली उंचच उंच इमारती उभ्या रहात आहेत. या सगळ्यांना वाहनतळ नाही, पण त्याविषयीही कोणीही बोलत नाही. पुणे मुंबई ठाणे अशा शहरांमध्ये कुठे आत आग लागली तर तिथे फायरब्रिगेडची गाडीही जाऊ शकत नाही.

शहरांचे नियोजन नावाची गोष्टच आपल्याकडे नसल्याबाबतही मी अनेकदा बोलतो, मुलाखतींमध्ये सांगतो, मात्र त्याला महत्व दिले जात नाही. आमच्या एकत्रिकरणाच्या बातम्या लावल्या जातात. प्रश्न वेगळेच आहेत. मेट्रो, उड्डाणपूल करून नव्या खासगी वाहनांच्या नोंदी होणे थांबले आहे का? नाही थांबलेले. मग हे पूल, मेट्रो, रस्ते वापरते तरी कोण? कधीतरी याचा विचार केला जाणार आहे की नाही असा वैताग राज यांनी व्यक्त केला. मुंबईत एकही दिवस असा जात नाही की रेल्वेचा अपघात झाला नाही. अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा कसला देताय, तिथे जा, बघा काय झालेय. ते सुधारण्याचा प्रयत्न करा, पण ते आपल्याकडे होतच नाही असे राज म्हणाले.

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे आहे. सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती. तिकडची रेल्वे इकडे आणू नका, पण ते ती चालवतात कशी? त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत? यामगचा जो विचार आहे तो तरी इकडे घेऊन या, त्याप्रमाणे काम करा. पण तेही काम होत नाही. केंद्र सरकारने, रेल्वे मंत्रालयाने या गोष्टीकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे असे मत राज यांनी व्यक्त केले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे तसेच मनसेचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज यांनी घेत काही सुचना दिल्या असल्याचे समजते.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेrailwayरेल्वेMumbaiमुंबईAccidentअपघातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार