शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप

By राजू इनामदार | Updated: June 9, 2025 15:36 IST

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे, सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती

पुणे: पक्षीय बैठकीसाठी म्हणून सोमवारी पुण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मुंब्रा येथे आजच सकाळी झालेल्या लोकल अपघातावरूनरेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय यांच्याबरोबरच पत्रकारांवरही टीकास्त्र सोडले. परप्रातांमधून मुुंबईत जोर येऊन आदळणारे लोंढेच या सगळ्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचे मत त्यांना व्यक्त केले. रेल्वे प्रशासन,रेल्वे मंत्रालय व पत्रकारांवरही त्यांनी टिकास्त्र सोडले

मुंबईची लोकल चालते कशी हे जगाला आश्चर्यच असल्याचे उपरोधिकपणे सांगत त्यांनी राज उद्धव एकत्र कधी येणार या बातम्यांऐवजी या दुरवस्थेकडे थोडे लक्ष द्या असे पत्रकारांनाही सुनावले. आपण वारंवार शहराच्या दुरवस्थेविषयी बोलतो, मात्र त्याला कधीही महत्व दिले जात नाही. आम्ही एकत्र कधी येणार याच्या बातम्यांना जेवढा वेळ दिला तेवढा वेळ आता या अपघातात मृत्यूमूखी पडलेल्यांना देणार का असा प्रश्न राज यांनी केला.

रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत लोकलमध्ये लोक येतात कुठून जातात कुठून काहीही कळत नाही. याची व्यवस्था लावण्यासाठी मुंबईतील लोकांनी रेल्वे मंत्रालयाला एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करा असे सांगितले होते, त्याचे काय झाले कोणालाही माहिती नाही. मेट्रो बांधताहेत, पुल बांधताहेत, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली उंचच उंच इमारती उभ्या रहात आहेत. या सगळ्यांना वाहनतळ नाही, पण त्याविषयीही कोणीही बोलत नाही. पुणे मुंबई ठाणे अशा शहरांमध्ये कुठे आत आग लागली तर तिथे फायरब्रिगेडची गाडीही जाऊ शकत नाही.

शहरांचे नियोजन नावाची गोष्टच आपल्याकडे नसल्याबाबतही मी अनेकदा बोलतो, मुलाखतींमध्ये सांगतो, मात्र त्याला महत्व दिले जात नाही. आमच्या एकत्रिकरणाच्या बातम्या लावल्या जातात. प्रश्न वेगळेच आहेत. मेट्रो, उड्डाणपूल करून नव्या खासगी वाहनांच्या नोंदी होणे थांबले आहे का? नाही थांबलेले. मग हे पूल, मेट्रो, रस्ते वापरते तरी कोण? कधीतरी याचा विचार केला जाणार आहे की नाही असा वैताग राज यांनी व्यक्त केला. मुंबईत एकही दिवस असा जात नाही की रेल्वेचा अपघात झाला नाही. अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा कसला देताय, तिथे जा, बघा काय झालेय. ते सुधारण्याचा प्रयत्न करा, पण ते आपल्याकडे होतच नाही असे राज म्हणाले.

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे आहे. सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती. तिकडची रेल्वे इकडे आणू नका, पण ते ती चालवतात कशी? त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत? यामगचा जो विचार आहे तो तरी इकडे घेऊन या, त्याप्रमाणे काम करा. पण तेही काम होत नाही. केंद्र सरकारने, रेल्वे मंत्रालयाने या गोष्टीकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे असे मत राज यांनी व्यक्त केले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे तसेच मनसेचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज यांनी घेत काही सुचना दिल्या असल्याचे समजते.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेrailwayरेल्वेMumbaiमुंबईAccidentअपघातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार