शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
3
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
4
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
5
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
6
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
7
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
8
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
9
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
10
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
11
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
12
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
13
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
14
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
15
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
16
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
17
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
18
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
19
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
20
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप

By राजू इनामदार | Updated: June 9, 2025 15:36 IST

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे, सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती

पुणे: पक्षीय बैठकीसाठी म्हणून सोमवारी पुण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मुंब्रा येथे आजच सकाळी झालेल्या लोकल अपघातावरूनरेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय यांच्याबरोबरच पत्रकारांवरही टीकास्त्र सोडले. परप्रातांमधून मुुंबईत जोर येऊन आदळणारे लोंढेच या सगळ्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचे मत त्यांना व्यक्त केले. रेल्वे प्रशासन,रेल्वे मंत्रालय व पत्रकारांवरही त्यांनी टिकास्त्र सोडले

मुंबईची लोकल चालते कशी हे जगाला आश्चर्यच असल्याचे उपरोधिकपणे सांगत त्यांनी राज उद्धव एकत्र कधी येणार या बातम्यांऐवजी या दुरवस्थेकडे थोडे लक्ष द्या असे पत्रकारांनाही सुनावले. आपण वारंवार शहराच्या दुरवस्थेविषयी बोलतो, मात्र त्याला कधीही महत्व दिले जात नाही. आम्ही एकत्र कधी येणार याच्या बातम्यांना जेवढा वेळ दिला तेवढा वेळ आता या अपघातात मृत्यूमूखी पडलेल्यांना देणार का असा प्रश्न राज यांनी केला.

रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत लोकलमध्ये लोक येतात कुठून जातात कुठून काहीही कळत नाही. याची व्यवस्था लावण्यासाठी मुंबईतील लोकांनी रेल्वे मंत्रालयाला एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करा असे सांगितले होते, त्याचे काय झाले कोणालाही माहिती नाही. मेट्रो बांधताहेत, पुल बांधताहेत, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली उंचच उंच इमारती उभ्या रहात आहेत. या सगळ्यांना वाहनतळ नाही, पण त्याविषयीही कोणीही बोलत नाही. पुणे मुंबई ठाणे अशा शहरांमध्ये कुठे आत आग लागली तर तिथे फायरब्रिगेडची गाडीही जाऊ शकत नाही.

शहरांचे नियोजन नावाची गोष्टच आपल्याकडे नसल्याबाबतही मी अनेकदा बोलतो, मुलाखतींमध्ये सांगतो, मात्र त्याला महत्व दिले जात नाही. आमच्या एकत्रिकरणाच्या बातम्या लावल्या जातात. प्रश्न वेगळेच आहेत. मेट्रो, उड्डाणपूल करून नव्या खासगी वाहनांच्या नोंदी होणे थांबले आहे का? नाही थांबलेले. मग हे पूल, मेट्रो, रस्ते वापरते तरी कोण? कधीतरी याचा विचार केला जाणार आहे की नाही असा वैताग राज यांनी व्यक्त केला. मुंबईत एकही दिवस असा जात नाही की रेल्वेचा अपघात झाला नाही. अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा कसला देताय, तिथे जा, बघा काय झालेय. ते सुधारण्याचा प्रयत्न करा, पण ते आपल्याकडे होतच नाही असे राज म्हणाले.

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे आहे. सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती. तिकडची रेल्वे इकडे आणू नका, पण ते ती चालवतात कशी? त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत? यामगचा जो विचार आहे तो तरी इकडे घेऊन या, त्याप्रमाणे काम करा. पण तेही काम होत नाही. केंद्र सरकारने, रेल्वे मंत्रालयाने या गोष्टीकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे असे मत राज यांनी व्यक्त केले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे तसेच मनसेचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज यांनी घेत काही सुचना दिल्या असल्याचे समजते.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेrailwayरेल्वेMumbaiमुंबईAccidentअपघातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार