शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या १४ सदस्यांपासून सुरू झालेला प्रवास महापालिकेच्या १६५ नगरसेवकापर्यंत गेला

By राजू हिंगे | Updated: August 16, 2025 13:15 IST

- एकेकाळी पुनवडी म्हणून छोटेसे असणारे गाव आता पुणे महानगर झाले आहे. पुणे महापालिका भौगोलिक क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका झाली आहे.

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पुण्यात नगरपालिका होती. पुणे नगरपालिकेची स्थापना १ जून १८५७ रोजी झाली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून पुण्याच्या कारभाराचा गाडा हाकला जात हाेता. याचा कारभार विश्रामबाग वाड्यातून केला जात होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनंतर म्हणजे १५ फेब्रुवारी १९५० रोजी स्थापना झाली. त्यानंतर पुणे महापालिकेत गावे समाविष्ट होऊन विस्तार झाला. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर सरकार नियुक्त आठ, तर पदसिद्ध सहा असे एकूण १४ सदस्य होते. आता पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या १६५ झाली आहे. एकेकाळी पुनवडी म्हणून छोटेसे असणारे गाव आता पुणे महानगर झाले आहे. पुणे महापालिका भौगोलिक क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका झाली आहे.

पुणे नगरपालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गाेखले, न. चिं. केळकर, आचार्य अत्रे हे सभासद होते. १८८२ ते १९२४ या काळात स्त्रियांना मतदानाचा अधिकार होता. उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहता येत नव्हते. त्याकाळी स्त्रियांमध्ये फारशी राजकीय जागृती नसल्याने त्यांनीदेखील या अन्यायाबद्दल तक्रार केली नाही. त्यानंतर सरकारनेच हा कायदा बदलला. स्त्रियांना उमेदवार म्हणून निवडणुकीस उभे राहण्यास परवानगी दिली. सन १९२४च्या पुढे स्त्रियांना नगरपालिकेच्या सभागृहात सभासद म्हणून बसण्याचा अधिकार होता; पण १९३८ पर्यंत एकही महिला सदस्य या सभागृहात सदस्य म्हणून निवडून आली नाही. सरकारने १९३८ साली स्त्रियांना काही जागा राखीव केल्या आणि त्यानंतरच स्त्रिया सदस्य म्हणून नगरपालिकेत दिसू लागल्या. १९३८ ते १९५८ पर्यंत म्हणजे गेली वीस वर्षे नगरपालिकेच्या सदस्यांमध्ये स्त्रियांचा समावेश होता. १९३८ ते १९५० पर्यंत त्यांच्यासाठी दोन जागा राखीव होत्या.

विमल गंगाधर चित्राव या १९३८ ते १९४५, तर भीमाबाई गंगाराम दांगट १९३८ ते १९४१ आणि १९४६ ते १९४९, लीलाबाई विश्वनाथ बापट १९४६ ते १९४९ दरम्यान नगरपालिकेच्या सदस्य होत्या. नगरपालिकेचे पुणे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर कार्यालयही विश्रामबाग वाडा येथेच होते. त्यानंतर शिवाजीनगर येथील जागेत म्हणजे आताचे महापालिका भवन हे कार्यालय बांधण्यात आले. पुणे महापालिकेच्या स्थापनेला तब्बल ७५ वर्षे झाली आहे. स्वांतत्र्यपूर्वीचे प्रशासन आणि स्वांतत्र्यांनतरच्या प्रशासनात खूप मोठा बदल झाला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे नगरसेविकांची संख्या वाढली आहे. नागरी सुविधांचे प्रमाणही वाढले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड