शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
6
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
7
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
8
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
9
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
10
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
11
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
12
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
13
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
14
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
15
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
16
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
18
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; आरोपी 3 मुलांचा बाप!
19
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
20
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन

By श्रीकिशन काळे | Updated: December 1, 2024 18:40 IST

घरातील ज्येष्ठ मंडळींनी मुला-मुलींना विसाव्या वर्षीच लग्नाचे अधिकार द्यावेत

पुणे : ‘सध्या जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर उपाय करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून सर्वांनी मुलगा किंवा मुलगी २० वर्षांची झाली की, त्यांना त्यांचा जोडीदार निवडण्याचा अधिकार द्यावा. ही पिढी समंजस आहे, ते योग्य जोडीदार निवडतील. पण अट एकच असेल की, त्यांनी आपल्याच समाजातील जोडीदार निवडला पाहिजे. त्यासाठी त्यांना आपण सर्व अधिकार देऊया,’ असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.

पुण्यामध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. त्याचा रविवारी (दि. १) दुसरा दिवस होता. मुथ्था यांनी सर्व उपस्थितांना या विषयावर शपथ घ्यायला लावली. ‘नई सोच, नई राह, निश्चिंत होकर तय करें विवाह’ या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचे सदस्य राजेंद्र लुंकर, नंदकिशोर साखला, गौतम बाफना, संप्रती शिंगवी, संजय शिंगी, प्रफुल्ल पारख, कोमल जैन, डॉ. पंकज चोपडा, दिनेश पारलेचा, प्रदीप संचेती, विलास राठोड, दीपक चोपडा, ज्ञानचंद आंचलिया, श्रीपाल खेमलपुरे, निरंजन जैन, ओमप्रकाश लुनावत, रमेश पटवारी, विजय जैन, राहुल नाहटा, आदेश चांगेडिया आदी उपस्थित होते.

सकाळच्या सत्रामध्ये ‘प्रतिबंब’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यामध्ये नंदकिशोर साखला यांनी सूत्रसंचालन केले तर मनोज लुंकड, प्रकाश गुलेचा, आरती लोढा, श्रवण डुगर, विजय जैन यांनी सहभाग घेतला. त्यानंतर तरुण पिढीकडून ‘परिवर्तन के लिए मंथन, पीढियों को जोडती सीढियां’ यावर मनोगते व्यक्त झाली. त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला तसेच एक नाटिकाही सादर केली. त्यात नव्या व जुन्या पिढीतील विसंवादाविषयी भाष्य करण्यात आले. दोघांनी समजून घेणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला.

त्यानंतर मुथ्था यांनी ‘विवाह’ या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले, ‘सध्या जैन समाजामध्ये विवाह ही खूप मोठी अडचण बनली आहे. बऱ्याच जणांचे शिक्षण सुरू असते आणि त्यामुळे घरातील माणसांना ते शिक्षणासाठी लग्न नंतर करू, असे सांगतात किंवा पुढे ढकलतात. परिणामी, नंतर वय निघून जाते आणि वय झाल्यामुळे लग्न लवकर जमत नाही. तेव्हा काहीच पर्याय हातात उरत नाही. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळींनी मुला-मुलींना विसाव्या वर्षीच लग्नाचे अधिकार द्यावेत. आपली नवी पिढी हुशार आहे. त्यांच्यावर आपल्याला अभिमान असला पाहिजे. ते जे करतील, ते योग्य करतील. हा विश्वास ठेवून त्यांना तुम्हीच लग्नासाठी जोडीदार निवडा, असे सांगा आणि तो आपल्या समाजातील हवा, एवढीच एक अट घाला.’ देशपातळीवर भारतीय जैन संघटनेतर्फे नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल म्हणून कार्य करण्यात येईल. त्यातील सदस्यांची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर अधिवेशनाचा समारोप झाला.

राष्ट्रसेवेसाठी योगदान !

दुपारच्या सत्रामध्ये प्रफुल्ल पारख यांनी राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकाला आवाहन केले. जैन धर्मीयांतून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती दानधर्म करून देशसेवा करत असतात. त्यांनी भारतीय जैन संघटनेसोबत राष्ट्रसेवेसाठीदेखील योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशनmarriageलग्नSocialसामाजिकhusband and wifeपती- जोडीदारStudentविद्यार्थी