शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अल्पवयीन मुलीला पळवून नेले अन् घडलं असं काही की, लग्न करूनही मुलास झाली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:31 IST

दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ते परराज्यात पळून गेले होते

पुणे : दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ते परराज्यात पळून गेले. पण त्याने तिच्याशी लग्न न करताच शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान, तिच्या वडिलांनी तिला फूस लावून कोणीतरी पळवून नेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ते दोघे मिळून आल्यानंतर सुरुवातीला तिने न्यायालयात प्रियकर आरोपीविरुद्ध विरुध्द साक्ष दिली. त्यानंतर आरोपीने शिक्षा होऊ नये म्हणून पीडितेशी लग्न केल्यामुळे तिने आरोपीविरुद्ध उलटतपासात आरोपीच्या बाजूने व सरकार पक्षाविरुध्द साक्ष दिली. मात्र याप्रकरणात न्यायालयाने पीडितेस फितूर साक्षीदार घोषित करत, आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली.

राकेश आणि माधुरी (नाव बदलले आहे) अशी त्यांची नावे आहे. ती 16 वर्षांची तर तो 24 वर्षांचा. 30 जानेवारी रोजी माधुरी हिच्या वडिलांनी तिला महाविद्यालयात सोडले. त्यानंतर तिच्या आईने शिक्षिकेला शाळा कधी सुटणार असा मेसेज केला. तेव्हा माधवी वर्गात आली नसल्याचे शिक्षिकेने सांगितले. त्यानंतर, तिच्या कुटुंबियांनी माधुरीला फूस लावून कोणीतरी पळवून नेल्याची लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपासादरम्यान, ती राकेशबरोबरगेल्याचे निष्पन्न झाले. अखेर,राकेश याला अटक करण्यात आली. यादरम्यान, राकेश याने तिच्याशी वेळेवेळी शारिरीक संबंध ठेवल्याचे वैद्यकीय तपासणीदरम्यान समोर आले. त्यानंतर राकेशविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

याप्रकरणात, विशेष सरकारी वकील ए. एस. ब्रम्हे व शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे त्यांनी चार साक्षीदार तपासले. यामध्ये, वैद्यकीय अधिका-याची साक्ष महत्त्वाची ठरली.

युक्तिवादादरम्यान, अॅड. देशमुख म्हणाल्या, मुलींना पळवून न्यायचे, गुन्हे करायचे आणि केवळ शिक्षा होऊ नये म्हणून पीडितेशी लग्न करायचे या प्रवृत्तीला आळा बसायला हवा, अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. वैद्यकीय पुरावा, सी. ए. अहवाल व तपासी अधिका-याची साक्ष महत्त्वाची मानत विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांच्या न्यायलयाने पीडित मुलगी फितूर होऊन देखील सरकार पक्षाने दिलेला पुरावा ग्राह्य मानून आरोपीस वीस वर्षांची शिक्षा सुनावली.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयmarriageलग्नPoliceपोलिस