शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला

By नम्रता फडणीस | Updated: May 5, 2023 17:23 IST

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचल्यावर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला

पुणे : थोरल्या भावाला पाच मुली. त्याला एकही मुलगा नव्हता. धाकट्या भावाला दोन मुले असल्याने त्याने आपला एक मुलगा भावाला दत्तक दयायचे ठरविले. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच दोन्ही भावांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये जमीन वाटपाबाबत वाद सुरू झाले. 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर लोकन्यायालयात मिटला.

 पूर्व हवेली तालुक्यातील कदम वाक वस्ती गावातील नावाजलेल्या शिवाजी पाटील (नाव बदललेले आहे) कुटुंबातील दोन सख्खे भाऊ. यामध्ये, थोरल्या भावाला पाच मुली व धाकट्या भावाला दोन मुले असल्याने थोरल्या भावाने एक मुलगा धाकट्या भावाला दत्तक देण्याचे ठरवले. कालांतराने पाच मुलींसह दोन मुलांचीही लग्न झाली. मात्र, दोन भावांमधील मुल दत्तक घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया राहून गेली. यादरम्यान, दोन्ही भावांचा मृत्यू झाल्यानंतर, 1954 सालापासून दोन्ही भावाच्या कुटुंबामध्ये शेतजमिनीवरून वाद-विवाद सुरू झाले.

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचूनही कुटुंबीय एकमेकांशी बोलत नव्हते.. यादरम्यान, दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला. शेतजमिनीचा वाद लोकन्यायालयात आल्यानंतर अॅड. वैभव धायगुडे-पाटील यांनी त्यामध्ये, कुटुंबियांच्या 23 बैठका घेत समुपदेशन केले. त्यानंतर कुटुंबातील चौथ्या पिढीतील तरुण सदस्यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठांची समजूत काढली. मागील 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद लोकन्यायालयात निकाली निघाल्याने कुटुंबियांसह न्यायाधीश पुराड उपाध्ये यांनीही समाधान व्यक्त केले. याप्रकरणात, अॅड. संदीप कुडते, अॅड. शरद आखाडे, अॅड. प्रतीक्षा कांबळे आणि अॅड. बलराज सपाटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारCourtन्यायालयFarmerशेतकरीSocialसामाजिक