शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला

By नम्रता फडणीस | Updated: May 5, 2023 17:23 IST

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचल्यावर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला

पुणे : थोरल्या भावाला पाच मुली. त्याला एकही मुलगा नव्हता. धाकट्या भावाला दोन मुले असल्याने त्याने आपला एक मुलगा भावाला दत्तक दयायचे ठरविले. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच दोन्ही भावांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये जमीन वाटपाबाबत वाद सुरू झाले. 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर लोकन्यायालयात मिटला.

 पूर्व हवेली तालुक्यातील कदम वाक वस्ती गावातील नावाजलेल्या शिवाजी पाटील (नाव बदललेले आहे) कुटुंबातील दोन सख्खे भाऊ. यामध्ये, थोरल्या भावाला पाच मुली व धाकट्या भावाला दोन मुले असल्याने थोरल्या भावाने एक मुलगा धाकट्या भावाला दत्तक देण्याचे ठरवले. कालांतराने पाच मुलींसह दोन मुलांचीही लग्न झाली. मात्र, दोन भावांमधील मुल दत्तक घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया राहून गेली. यादरम्यान, दोन्ही भावांचा मृत्यू झाल्यानंतर, 1954 सालापासून दोन्ही भावाच्या कुटुंबामध्ये शेतजमिनीवरून वाद-विवाद सुरू झाले.

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचूनही कुटुंबीय एकमेकांशी बोलत नव्हते.. यादरम्यान, दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला. शेतजमिनीचा वाद लोकन्यायालयात आल्यानंतर अॅड. वैभव धायगुडे-पाटील यांनी त्यामध्ये, कुटुंबियांच्या 23 बैठका घेत समुपदेशन केले. त्यानंतर कुटुंबातील चौथ्या पिढीतील तरुण सदस्यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठांची समजूत काढली. मागील 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद लोकन्यायालयात निकाली निघाल्याने कुटुंबियांसह न्यायाधीश पुराड उपाध्ये यांनीही समाधान व्यक्त केले. याप्रकरणात, अॅड. संदीप कुडते, अॅड. शरद आखाडे, अॅड. प्रतीक्षा कांबळे आणि अॅड. बलराज सपाटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारCourtन्यायालयFarmerशेतकरीSocialसामाजिक