शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Love Marriage: दाम्पत्यांनी पळून जाऊन लग्न केले; ८ वर्ष वेगळे राहूनही भलतंच काहीतरी घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:59 IST

आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.

पुणे : दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने दोघांनी मुंबईला पळून जाऊन धर्मशास्त्राप्रमाणे लग्न केले. पण तीन महिन्यातच दोघांमध्ये वैचारिक मतभेद सुरू झाले आणि तिची पुण्यामध्ये नोकरीची व राहाण्याची व्यवस्था करून तो रत्नागिरीला गावी शेती करायला गेला. दोघांच्याही लग्नाला तब्बल आठ वर्षे झाली. पण सोबत राहिले केवळ तीनच महिने. अखेर परस्पर संमतीने दोघांनीही घट्स्फोटासाठी दावा दाखल केला. आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.

राज आणि सीमा (दोघांची नावे बदलेली) दोघेही रत्नागिरी या एकाच गावी राहाणारे आहेत. दोघांचे प्रेम जमल्यानंतर लग्न करण्याची इच्छा त्यांनी कुटुंबियांसमोर व्यक्त केली. परंतु घरच्यांचा लग्नाला विरोध होता. दोघांनी मुंबईला पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दाम्पत्य कामधंदा शोधण्यासाठी पुण्यात आले आणि एका मॉलमध्ये कामाला लागले. परंतु तीन महिन्यातच दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघांनी वेगळे राहाण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही लग्नाला तब्बल साडेआठ वर्षे झाली होती.

त्यामुळे दोघांनी घट्स्फोटासाठी अँड शशिकांत एस बागमार, अँड निनाद एस.बागमार आणि अँड गौरी एस. शिनगारे यांच्या मार्फत पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता 31 जानेवारी रोजी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. कायद्याप्रमाणे दहा महिन्याचा कालावधी जाणे आवश्यक होते. परंतु वकिलांनी दाव्यामध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा व लवकरात लवकर हा दावा निकाली काढण्यात यावा असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. दोघांची पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाम्पत्याला 8 फेब्रुवारी रोजी म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये घटस्फोट मंजूर केला.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocialसामाजिकCourtन्यायालय