शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

Love Marriage: दाम्पत्यांनी पळून जाऊन लग्न केले; ८ वर्ष वेगळे राहूनही भलतंच काहीतरी घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:59 IST

आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.

पुणे : दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने दोघांनी मुंबईला पळून जाऊन धर्मशास्त्राप्रमाणे लग्न केले. पण तीन महिन्यातच दोघांमध्ये वैचारिक मतभेद सुरू झाले आणि तिची पुण्यामध्ये नोकरीची व राहाण्याची व्यवस्था करून तो रत्नागिरीला गावी शेती करायला गेला. दोघांच्याही लग्नाला तब्बल आठ वर्षे झाली. पण सोबत राहिले केवळ तीनच महिने. अखेर परस्पर संमतीने दोघांनीही घट्स्फोटासाठी दावा दाखल केला. आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.

राज आणि सीमा (दोघांची नावे बदलेली) दोघेही रत्नागिरी या एकाच गावी राहाणारे आहेत. दोघांचे प्रेम जमल्यानंतर लग्न करण्याची इच्छा त्यांनी कुटुंबियांसमोर व्यक्त केली. परंतु घरच्यांचा लग्नाला विरोध होता. दोघांनी मुंबईला पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दाम्पत्य कामधंदा शोधण्यासाठी पुण्यात आले आणि एका मॉलमध्ये कामाला लागले. परंतु तीन महिन्यातच दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघांनी वेगळे राहाण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही लग्नाला तब्बल साडेआठ वर्षे झाली होती.

त्यामुळे दोघांनी घट्स्फोटासाठी अँड शशिकांत एस बागमार, अँड निनाद एस.बागमार आणि अँड गौरी एस. शिनगारे यांच्या मार्फत पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता 31 जानेवारी रोजी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. कायद्याप्रमाणे दहा महिन्याचा कालावधी जाणे आवश्यक होते. परंतु वकिलांनी दाव्यामध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा व लवकरात लवकर हा दावा निकाली काढण्यात यावा असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. दोघांची पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाम्पत्याला 8 फेब्रुवारी रोजी म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये घटस्फोट मंजूर केला.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocialसामाजिकCourtन्यायालय