शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

Love Marriage: दाम्पत्यांनी पळून जाऊन लग्न केले; ८ वर्ष वेगळे राहूनही भलतंच काहीतरी घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:59 IST

आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.

पुणे : दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने दोघांनी मुंबईला पळून जाऊन धर्मशास्त्राप्रमाणे लग्न केले. पण तीन महिन्यातच दोघांमध्ये वैचारिक मतभेद सुरू झाले आणि तिची पुण्यामध्ये नोकरीची व राहाण्याची व्यवस्था करून तो रत्नागिरीला गावी शेती करायला गेला. दोघांच्याही लग्नाला तब्बल आठ वर्षे झाली. पण सोबत राहिले केवळ तीनच महिने. अखेर परस्पर संमतीने दोघांनीही घट्स्फोटासाठी दावा दाखल केला. आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.

राज आणि सीमा (दोघांची नावे बदलेली) दोघेही रत्नागिरी या एकाच गावी राहाणारे आहेत. दोघांचे प्रेम जमल्यानंतर लग्न करण्याची इच्छा त्यांनी कुटुंबियांसमोर व्यक्त केली. परंतु घरच्यांचा लग्नाला विरोध होता. दोघांनी मुंबईला पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दाम्पत्य कामधंदा शोधण्यासाठी पुण्यात आले आणि एका मॉलमध्ये कामाला लागले. परंतु तीन महिन्यातच दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघांनी वेगळे राहाण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही लग्नाला तब्बल साडेआठ वर्षे झाली होती.

त्यामुळे दोघांनी घट्स्फोटासाठी अँड शशिकांत एस बागमार, अँड निनाद एस.बागमार आणि अँड गौरी एस. शिनगारे यांच्या मार्फत पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता 31 जानेवारी रोजी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. कायद्याप्रमाणे दहा महिन्याचा कालावधी जाणे आवश्यक होते. परंतु वकिलांनी दाव्यामध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा व लवकरात लवकर हा दावा निकाली काढण्यात यावा असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. दोघांची पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाम्पत्याला 8 फेब्रुवारी रोजी म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये घटस्फोट मंजूर केला.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocialसामाजिकCourtन्यायालय