शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

By नितीन चौधरी | Updated: February 12, 2024 18:56 IST

पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगल पोलिसांनी घडविली आहे. त्यावेळी जी नावे घेतली आहे, त्यांनीच दंगल घडविली आहे, असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरेगाव भीमा आयोगापुढे आंबेडकर यांची उलटतपासणी अंतिम टप्प्यात असताना त्यांनी ही साक्ष दिली. हे प्रकरण भलतीकडे वळविण्याचे काम सुरू आहे. ते माझ्या तोंडून वदवून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने सुनावणीतून मी बाहेर पडतो, असे आयोगाला सांगून मी बाहेर पडलो, अशा शब्दांत सुनावणी अर्धवट सोडून बाहेर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

आंबेडकर म्हणाले, ‘मी लेखी म्हणणे कधीच मांडले नाही. या आयोगाला न्यायालयाचे अधिकार दिले नसल्याने त्या आयोगासमोर उभे राहायचे नाही असे ठरविले होते. मात्र, आयोगाने आपल्याला समन्स काढले आणि नागरीक म्हणून आपल्याला उभे राहावे लागेल म्हणून सुनावणीला आलो.’

दरम्यान, आयोगाच्या सुनावणीतून आंबेडकर बाहेर पडल्याने आयोगाचे सरकारी वकील अड. शिशिर हिरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत वस्तुस्थिती मांडली. हिरे म्हणाले, ‘आंबेडकर यांची सरकार पक्षातर्फे त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. एल्गार परिषदेचे आयोजन आणि त्यापूर्वीच्या गोष्टींचा अंतर्भाव होता. कोरेगाव परिसरात हिंसाचार झाला. त्यानंतर दोन जानेवारीला आंबेडकर यांनी तीन जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यावेळी महाराष्ट्रात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी खासगी, सरकारी मालमत्तेचे नुकसान कोण जबाबदार हा प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालयाने बंद पुकारणाऱ्याला झालेल्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी लागते असे निवाडे दिले आहेत. राज्यातील ३४ पोलिस मुख्यालयातील ५७१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. पाच कोटीपेक्षा जास्त सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याबाबत जबाबदारी कोणाची असा प्रश्न आंबेडकर यांना विचारला. त्यावेळी उत्तर न देता त्यांनी या कामकाजातून स्वतःला बाजूला करून घेतले आहे.’

‘मी सरकारी वकील आहे. पोलिसांसह राज्य सरकारने कोरेगाव भीमा तसेच शिक्रापूर परिसरात पुरेशी व्यवस्था केली होती. पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे. त्यांनी कोठेही अपुरी व्यवस्था ठेवली नव्हती. कोट्यवधी रुपयांचे स्थानिकांचे नुकसान झाले तरी दोन्ही समाजाला समोरासमोर येऊ दिले नाही. तसेच पोलिसांनी गोळीबारही केला नव्हता. 

विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपपत्र दाखल आहे. गुन्ह्याच्या तपासात काही गोष्टी उलगडल्या आहेत. कोणतीही दंगल अचानक होत नसते. त्यामागे नियोजन असते. वढूला २८ डिसेंबरच्या रात्री प्रक्षोभक असा फलक लावला जातो. त्यामुळे स्थानिक वातावरण खराब होते. त्यानंतर त्याबाबत बैठका होतात. त्या बैठकांमधून काही बांधवांना चिथावले जाते. त्या गोष्टी पोलिस तपासात समोर आले असून ते आयोगासमोर आणले आहे. याबाबत सविस्तर दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. न्याय प्रविष्ठ बाब असू त्याबाबत सविस्तर बोलता येणार नाही. संघटनाच्या बैटका नाही तर लाँग मार्च करण्यात आले. वातावरण निर्मिती करण्यात आली. याबाबत सविस्तर खुलासा दोषारोपपत्रात आहे. याबाबत स्पष्ट सांगता येणार नाही, याचा पुनरुच्चार अड, हिरे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार