शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

By नितीन चौधरी | Updated: February 12, 2024 18:56 IST

पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगल पोलिसांनी घडविली आहे. त्यावेळी जी नावे घेतली आहे, त्यांनीच दंगल घडविली आहे, असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरेगाव भीमा आयोगापुढे आंबेडकर यांची उलटतपासणी अंतिम टप्प्यात असताना त्यांनी ही साक्ष दिली. हे प्रकरण भलतीकडे वळविण्याचे काम सुरू आहे. ते माझ्या तोंडून वदवून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने सुनावणीतून मी बाहेर पडतो, असे आयोगाला सांगून मी बाहेर पडलो, अशा शब्दांत सुनावणी अर्धवट सोडून बाहेर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

आंबेडकर म्हणाले, ‘मी लेखी म्हणणे कधीच मांडले नाही. या आयोगाला न्यायालयाचे अधिकार दिले नसल्याने त्या आयोगासमोर उभे राहायचे नाही असे ठरविले होते. मात्र, आयोगाने आपल्याला समन्स काढले आणि नागरीक म्हणून आपल्याला उभे राहावे लागेल म्हणून सुनावणीला आलो.’

दरम्यान, आयोगाच्या सुनावणीतून आंबेडकर बाहेर पडल्याने आयोगाचे सरकारी वकील अड. शिशिर हिरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत वस्तुस्थिती मांडली. हिरे म्हणाले, ‘आंबेडकर यांची सरकार पक्षातर्फे त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. एल्गार परिषदेचे आयोजन आणि त्यापूर्वीच्या गोष्टींचा अंतर्भाव होता. कोरेगाव परिसरात हिंसाचार झाला. त्यानंतर दोन जानेवारीला आंबेडकर यांनी तीन जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यावेळी महाराष्ट्रात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी खासगी, सरकारी मालमत्तेचे नुकसान कोण जबाबदार हा प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालयाने बंद पुकारणाऱ्याला झालेल्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी लागते असे निवाडे दिले आहेत. राज्यातील ३४ पोलिस मुख्यालयातील ५७१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. पाच कोटीपेक्षा जास्त सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याबाबत जबाबदारी कोणाची असा प्रश्न आंबेडकर यांना विचारला. त्यावेळी उत्तर न देता त्यांनी या कामकाजातून स्वतःला बाजूला करून घेतले आहे.’

‘मी सरकारी वकील आहे. पोलिसांसह राज्य सरकारने कोरेगाव भीमा तसेच शिक्रापूर परिसरात पुरेशी व्यवस्था केली होती. पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे. त्यांनी कोठेही अपुरी व्यवस्था ठेवली नव्हती. कोट्यवधी रुपयांचे स्थानिकांचे नुकसान झाले तरी दोन्ही समाजाला समोरासमोर येऊ दिले नाही. तसेच पोलिसांनी गोळीबारही केला नव्हता. 

विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपपत्र दाखल आहे. गुन्ह्याच्या तपासात काही गोष्टी उलगडल्या आहेत. कोणतीही दंगल अचानक होत नसते. त्यामागे नियोजन असते. वढूला २८ डिसेंबरच्या रात्री प्रक्षोभक असा फलक लावला जातो. त्यामुळे स्थानिक वातावरण खराब होते. त्यानंतर त्याबाबत बैठका होतात. त्या बैठकांमधून काही बांधवांना चिथावले जाते. त्या गोष्टी पोलिस तपासात समोर आले असून ते आयोगासमोर आणले आहे. याबाबत सविस्तर दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. न्याय प्रविष्ठ बाब असू त्याबाबत सविस्तर बोलता येणार नाही. संघटनाच्या बैटका नाही तर लाँग मार्च करण्यात आले. वातावरण निर्मिती करण्यात आली. याबाबत सविस्तर खुलासा दोषारोपपत्रात आहे. याबाबत स्पष्ट सांगता येणार नाही, याचा पुनरुच्चार अड, हिरे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार