शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा फेरविचार करावा - विरधवल जगदाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 10:59 IST

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता

राहू: केंद्र सरकारने नूकताच साखर कारखान्यांनी इथेनॉल ( आसवानी) निर्मिती बाबत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत फेरविचार होणे अतिशय गरजेचे असल्याचे दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक विरधवल जगदाळे यांनी सांगितले.

राहू (ता.दौंड) येथे शेतकी गट ऑफिसला भेट दिल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयावर प्रतिक्रिया दिली. दौंड शुगर साखर कारखान्याची सध्याची गाळप क्षमता १७५०० मे टन प्रति दिन असुन आज पर्यंत कारखान्याने ५ लाख १० हजार मेट्रिक टन गाळप केलेले आहे. कारखान्याने केंद्र सरकारच्या धोरणानुसार नुकताच इथेनॉल (आसवानी) २५० के एल बी डी चा प्रकल्प १६० कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित झालेला आहे. या निर्णयामुळे हा नवीन प्रकल्प ज्यूस (रस) ते इथेनॉल बंद करण्याची वेळ आली आहे.

एका बाजूने केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती करिता प्रोत्साहन देते आणि दुसऱ्या बाजूने देशांतर्गत वापरासाठी मोठ्या प्रमाणावर साखर निर्मिती करा अशा प्रकारचा आदेश देत आहेत. साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन सुरू केलेल्या या प्रकल्पांचे भवितव्य अधांतरीत झालेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या उपपदार्थ निर्मितीमुळे एफ आर पी पेक्षा अधिकचा बाजार भाव साखर कारखान्यांना देता आलेला आहे. दौंड शुगरने देखील सन २०२३-२४ च्या गाळप हंगामापोटी २९०० रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे आगामी काळात शेतकरी बांधवांचे देखील आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी