शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा फेरविचार करावा - विरधवल जगदाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 10:59 IST

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता

राहू: केंद्र सरकारने नूकताच साखर कारखान्यांनी इथेनॉल ( आसवानी) निर्मिती बाबत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत फेरविचार होणे अतिशय गरजेचे असल्याचे दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक विरधवल जगदाळे यांनी सांगितले.

राहू (ता.दौंड) येथे शेतकी गट ऑफिसला भेट दिल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयावर प्रतिक्रिया दिली. दौंड शुगर साखर कारखान्याची सध्याची गाळप क्षमता १७५०० मे टन प्रति दिन असुन आज पर्यंत कारखान्याने ५ लाख १० हजार मेट्रिक टन गाळप केलेले आहे. कारखान्याने केंद्र सरकारच्या धोरणानुसार नुकताच इथेनॉल (आसवानी) २५० के एल बी डी चा प्रकल्प १६० कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित झालेला आहे. या निर्णयामुळे हा नवीन प्रकल्प ज्यूस (रस) ते इथेनॉल बंद करण्याची वेळ आली आहे.

एका बाजूने केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती करिता प्रोत्साहन देते आणि दुसऱ्या बाजूने देशांतर्गत वापरासाठी मोठ्या प्रमाणावर साखर निर्मिती करा अशा प्रकारचा आदेश देत आहेत. साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन सुरू केलेल्या या प्रकल्पांचे भवितव्य अधांतरीत झालेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या उपपदार्थ निर्मितीमुळे एफ आर पी पेक्षा अधिकचा बाजार भाव साखर कारखान्यांना देता आलेला आहे. दौंड शुगरने देखील सन २०२३-२४ च्या गाळप हंगामापोटी २९०० रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे आगामी काळात शेतकरी बांधवांचे देखील आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी