शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसलाय : आढळराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:39 IST

तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय, आढळराव पाटील यांचं वक्तव्य.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दिलीप लांडे हे ३८ वे आमदार त्यांच्या गटात गेल्यानंतर मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झाले होते. अनेक बंडखोर आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी मागणी केली होती. दरम्यान, आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसला असल्याचं वक्तव्य केलं आहे.

“या तालुक्यात सर्वात जास्त, तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय. साधी गोष्ट सांगतो, गेल्या तीन दिवसांपासून ऐकतोय, १५०-२०० जीआर एक दोन दिवसांत काढलेत. पुणे जिल्ह्याच्या डीपीडीसीचा १७० कोटी रूपयांचा फंड एकतर्फी शिरूरच्या खासदारांना १५ कोटी, बारामतीच्या खासदाराला १८ कोटी, जुन्नरच्या आमदारांना १० कोटी, खेडच्या आमदारांना १२ कोटी अशा १७८ कोटींचे प्रस्ताव मंजूर करून सहीला गेलेत. जिल्हा परिषदेचे सदस्य नाही, मंत्री नाहीत, कोणाला काही विचारलं नाही, कोणाचं काही अपील नाही. हे काय सुरू आहे? किती आम्ही सहन करायचं याचा विचार व्हायला पाहिजे या मताचा मी आहे,” असं आढळराव पाटील म्हणाले. पुण्यातील चाकण येथे बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं.

“कोणत्याही परिस्थिती शिवसेना एकत्र राहिली पाहिजे. आजही आपल्या पक्षावर संकट आलंय. सर्वांचीच जबाबदारी आहे, पण मी पुढे राहणार. पण बोटचेपी धोरण करता कामा नये. कशासाठी लोक तुमच्याकढे येतील, का उभे राहतील?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावPuneपुणे