शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

दहावी-बारावीच्या निकालास जुलै उजाडणार; उत्तरपत्रिका जमा करण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 3:52 AM

उत्तरपत्रिका जमा झाल्यावर ३० ते ४० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल केव्हा लागणार, याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, राज्यातील नऊपैकी एकाही विभागीय मंडळाकडे अद्याप १०० टक्के उत्तरपत्रिका जमा झालेल्या नाहीत. उत्तरपत्रिका जमा झाल्यावर ३० ते ४० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे यंदा दहावी- बारावीच्या निकालास जुलै महिना उजाडणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम एक महिना ठप्प होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामास वेग आला असून राज्य मंडळाकडे उत्तरपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० मे पर्यंत शंभर टक्के उत्तरपत्रिका जमा करण्याचे वेळापत्रक काही विभागीय मंडळांकडून आखण्यात आले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उत्तरपत्रिका जमा करण्यास अडचणी येत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व उत्तरपत्रिका जमा होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे मंडळाकडे ३० टक्केच उत्तरपत्रिका

नऊ विभागीय मंडळांपैकी एका मंडळाचा निकाल मागे राहिला तरी राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. सध्या मुंबई, पुणे, नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील उत्तरपत्रिका जमा करण्यास अडचणी येऊ शकतात. सध्या पुणे विभागीय मंडळाकडे दहावीच्या ३० टक्के व बारावीच्या ४० टक्के उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत.

औरंगाबाद विभागीय मंडळाकडे दहावीच्या ३० तर बारावीच्या ७२ टक्के उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत. उर्वरित सर्व विभागीय मंडळाकडे ७८ ते ९८ टक्क्यांपर्यंत उत्तरपत्रिका जमा झाल्या असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एक किंवा दोन विभागीय मंडळामुळे पूर्ण राज्याचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीEducationशिक्षण