शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

दहावी-बारावीच्या निकालास जुलै उजाडणार; उत्तरपत्रिका जमा करण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 06:31 IST

उत्तरपत्रिका जमा झाल्यावर ३० ते ४० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल केव्हा लागणार, याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, राज्यातील नऊपैकी एकाही विभागीय मंडळाकडे अद्याप १०० टक्के उत्तरपत्रिका जमा झालेल्या नाहीत. उत्तरपत्रिका जमा झाल्यावर ३० ते ४० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे यंदा दहावी- बारावीच्या निकालास जुलै महिना उजाडणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम एक महिना ठप्प होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामास वेग आला असून राज्य मंडळाकडे उत्तरपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० मे पर्यंत शंभर टक्के उत्तरपत्रिका जमा करण्याचे वेळापत्रक काही विभागीय मंडळांकडून आखण्यात आले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उत्तरपत्रिका जमा करण्यास अडचणी येत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व उत्तरपत्रिका जमा होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे मंडळाकडे ३० टक्केच उत्तरपत्रिका

नऊ विभागीय मंडळांपैकी एका मंडळाचा निकाल मागे राहिला तरी राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. सध्या मुंबई, पुणे, नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील उत्तरपत्रिका जमा करण्यास अडचणी येऊ शकतात. सध्या पुणे विभागीय मंडळाकडे दहावीच्या ३० टक्के व बारावीच्या ४० टक्के उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत.

औरंगाबाद विभागीय मंडळाकडे दहावीच्या ३० तर बारावीच्या ७२ टक्के उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत. उर्वरित सर्व विभागीय मंडळाकडे ७८ ते ९८ टक्क्यांपर्यंत उत्तरपत्रिका जमा झाल्या असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एक किंवा दोन विभागीय मंडळामुळे पूर्ण राज्याचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीEducationशिक्षण