शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

सांग सांग भोलानाथ..खेड पंचायत समितीच्या इमारतीचे काम कधी सुरू होणार? पुण्यात शिवसेनेचे'जागरण गोंधळ'आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 14:31 IST

पुण्याची जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे.हे वेळीच थांबवा. एखाद्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे अधिकाऱ्यांना शोभत नाही..

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी आंदोलकांचे स्विकारले निवेदन

पुणे: सांग सांग भोलानाथ.. खेड पंचायत समितीच्या इमारतीचे काम कधी सुरू होणार? प्रशासनाला जाग कधी येणार? असा प्रश्न नंदी बैलाला विचारत, जवाब दो.. जवाब दो आयुष प्रसाद ..जवाब दो,जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा धिक्कार असो यांसारख्या जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने 'जागरण गोंधळ' आंदोलन करण्यात आले.

 खेड तालुका पंचायत समितीच्या कामाला चार कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या कामाला मंजुरी मिळाली, भूमिपूजन झाले, कामाची वर्क ऑर्डर निघून सहा महिने उलटूनही काम सुरू करण्याचे आदेश न दिल्याने शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गोधळ घालत आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार तसेच शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, उपजिल्हा प्रमुख सुनील बानखिले, शिवसेनेचे गटनेते आणि जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, बाबाजी काळे, तनुजा घनवट, शालाखा कोंडे, ज्योती झेंडे, रुपाली कड, शैलजा खंडागळे, उपसभापती ज्योती अरगडे , सिधुताई शिंदे, भगवान पोखरकर, सुभद्रा शिंदे, मच्छिद्र गावडे, अमर कांबळे, सुरेश चव्हाण, किरण गवारी, विशाल पोटले, बापू थिटे, राहुल मलगे, केशव अरगडे, संतोष अरगडे आदी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले.मात्र, काम लवकर सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, खेड पंचायत समिती इमारतीचे शिवसेनेच्या तत्कालीन खासदार- आमदार यांनी मंजूर केलेले काम होऊ द्यायचे नाही या राजकीय हेतूने विरोध केला जात आहे. पालकमंत्र्यांना भेटलो. तेव्हा लक्षात आले की, खेडच्या विद्यमान आमदारांनी त्यांना चुकीची माहिती दिली. मग मी त्यांना कामाची वर्कऑर्डर झालेली आहे,भूमिपूजन झाले आहे,बांधकाम परवाना मिळाला आहेत असे सर्व काही सांगितले. त्यावर अजित पवार म्हणाले, आपण एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सहा महिने झाले. त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण विकास मंत्री यांचे पत्र आल्यावर काम सुरू करू असे सांगितल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्र्यांचे पत्र आणले.आयुष प्रसाद हे तिकडे गोड बोलतात.आणि इकडे ही गोड बोलतात.मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. परंतु शिवसेनेचे खच्चीकरण होत असेल तर या पुढील काळातही रस्त्यावर उतरावे लागेल. पुण्याची जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे.हे वेळीच थांबवा. एखाद्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे अधिकाऱ्यांना शोभत नाही. हे आंदोलन म्हणजे फक्त इशारा आहे. खोटे आदेश काढण्याचे काम अधून मधून चालते. चांगलं आरोग्य, चांगले शिक्षण ,विकास कामे झाली पाहिजेत. परंतु राजकारणा चढाओढ सुरू आहे, असेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले 

टॅग्स :PuneपुणेShiv Senaशिवसेनाzpजिल्हा परिषदKhedखेडShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावAjit Pawarअजित पवार