शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना व्हायचंय लिपिक

By admin | Updated: January 28, 2015 02:35 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. परंतु, शिक्षकाची नोकरी नाही, तर किमान लिपिकाची तरी नोकरी मिळावी म्हणून हे उमेदवार आता टायपिंग परीक्षेकडे वळले आहेत. परिणामी, परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर २०१४ घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या तब्बल ३ लाख ४८ हजारांवर पोहोचली आहे.परीक्षा परिषदेतर्फे १९९९मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला १ लाख ४६ विद्यार्थी ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९० हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेचा शेकडा निकाल ५३.४८ टक्के लागला होता. परंतु, शासकीय भरती प्रक्रिया बंद झाल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजारांपर्यंत खाली आली होती. तसेच ज्या वेळी शासनाकडून भरतीवरील बंदी उठविली जाते. त्यानंतर त्वरितच या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते, असे गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यातच काही वर्षांपासून दर वर्षी डीएड आणि बीएड पदवी घेऊन लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी शासकीय व खासगी कंपन्यांमध्ये लिपिकपदाची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच २०१२पासून दर वर्षी २ लाखांहून अधिक विद्यार्थी टायपिंगची परीक्षा देत असल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)