शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रामायण महाभारत शाळा-महाविद्यालयांमधून शिकवा : हिंदू जनजागृती समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 19:09 IST

युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली.

पुणे : धर्मनिरपेक्षताच्या नावाखाली हिंदु विद्यार्थी ज्या शाळामध्ये शिकतात, तेथे धार्मिक शिक्षणाला अटकाव केला जाताे. त्यामुळे आजची हिंदू युवापिढी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे चंगळवाद, व्यसनाधीनता आणि वासनांच्या आहीर जात आहे. त्यामुळे युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली. 

समितीच्यावतीने झाशीची राणी चाैकात आंदाेलन करण्यात आले त्यावेळी ही मागणी करण्यात आली. त्याचबराेबर सरकारने तात्काळ कायदा करुन राममंदिर उभारावे अशीही जाेरदार मागणी यावेळी करण्यात आली. हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे लज्जास्पद आहे. केंद्रात आणि उत्तरप्रदेशात दाेन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे श्रीराम मंदिर उभारणीसाठी संसदेत तात्काळ कायदा बनवून अयाेध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

तसेच भारत धर्मनिरपेक्ष देश आहे असे सांगून मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते, ख्रिस्ती मिशनरींच्या काॅन्व्हेंट शाळांमध्ये बायबल शिकवले जाते परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदु विद्यार्थी ज्या शाळांत शिकतात, तेथे धार्मिक शिक्षणाला अटकाव केला जाताे. असा आराेप समितीकडून करण्यात आला आहे. धर्मशिक्षणातून नीतीमत्ता येते. सध्या ते मिळतच नसल्याने समाजात चाेऱ्या, खून, दराेडे, बलात्कार आणि भ्रष्टाचार आदींसारखे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे भावी पिढी सुजाण, संस्कारक्षम आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने हिंदूना त्यांच्या धर्मग्रंथांचे शिक्षण सर्व शाळा - महाविद्यालयांमधून प्रतिदिन देण्यात यावे असे यावेळी सांगण्यात आले. 

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य मांस यांच्या विक्रीवर बंदी घालावी, तसेच हनुमानाच्या जातीवरुन वाद घालणाऱ्यांवर कठाेर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :Hindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीPuneपुणेramayanरामायण