शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पहिल्याच अहवालात दीनानाथ रुग्णालय दोषी; इतर चौकशांचा फार्स कशासाठी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 21:39 IST

या सर्व समित्यांचा अहवालाचा अट्टाहास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बचावासाठी तर नाही ना ?

पुणेतनिषा भिसे मृत्यूप्रकरणी शासनाने आरोग्य संचालक डॉ.राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पाच सदस्यांच्या समितीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दोषांवर बोट ठेवले होते.तातडीच्या उपचारांची गरज असताना तनिषा भिसे यांच्यावर मंगेशकर रुग्णालयाने उपचार केले नाहीत ही त्यांची चूक झाली. असे स्पष्टपणे अहवालात नमूद केले असतानाही त्यावर माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मदाय आयुक्त कार्यालय, सर्वात शेवटी पुन्हा ससुन रुग्णालय व बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती.

या सर्व समित्यांचा अहवालाचा अट्टाहास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बचावासाठी तर नाही ना ? अहवालातील दिरंगाईने अशा प्रकारे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा अहवाल याबाबत कोणत्याच ठोस गोष्टी समोर न आल्याने ससून रुग्णालय समितीच्या अहवालात नेमके काय? या प्रश्नांना बगल देणारी प्रशासकीय यंत्रणा वरील संशयाला खतपाणीच घालत आहे. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी स्थापन करण्यात आलेली चौथी ससुन रुग्णालयाची समिती मंगेशकर रुग्णालयाच्या बाजूने अहवाल देण्यासाठीच का ? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 'आयोग आपल्या दारी' उपक्रमाचा आढावा घेतला. या वेळी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच, असे सांगताना या प्रकरणी बारकाईने चौकशी सुरू आहे. ससुन रुग्णालय समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच पोलिस प्रशासन गुन्हे दाखल करण्याची कारवाई करेल असे म्हटले आहे.या वेळी उपस्थित असलेले ससुन रुग्णालय चौकशी समितेचे अध्यक्ष व बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी अंतिम चौकशी अहवाल रात्री पर्यंत शासनाला सादर केला जाईल. शासन तो पुणेपोलिस अथवा अलंकार पोलिस ठाण्याला पाठवेल. असे सांगताना अहवालातील ठळक गोष्टींबाबत कोणतीच स्पष्टता न केल्याने त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. त्यावर कुठलाच दबाव नसून दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय, आणि इंदिरा आयव्हिएफ फर्टिलिटी सेंटर या सर्व ठिकाणच्या संबंधित कागदपत्रांची व जबाबांची बारकाईने नोंद घेतली आहे. यात इंडियन मेडिकल असोसिएशन व महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन यांनी केलेला पत्रव्यवहारही लक्षात घेण्यात आला आहे. असे सांगतानाच गोपनीयतेचे कारण पुढे करून अहवालातील ठोस बाबी सांगण्यास नकार दिला. 

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तातडीने उपचार न देणे हा वैद्यकीय निष्काळजीपणा झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रथम अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे असताना ठराविक काळानंतर वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्यांचे अहवाल घेण्याचे नेमके कारण काय? एकीकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची भिशी कुटुंबीयांची मागणी. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेल्या संताप जनक भावना यांचा विचार करून योग्य कारवाई करण्याची प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.

पिडीतांना न्याय देण्यासाठी एसओपी स्थापन करण्याबाबत आलेल्या सूचनांनुसार संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश महिला आयोगाकडून देण्यात आले. यामुळे चौकशीत सुसूत्रता व नियोजनबद्धता येणार असल्याने संबंधित पिडीते विषयी सर्व चौकशी अहवाल तात्काळ सादर करता येणार आहेत. यात कुठलीही दिरंगाई होऊ नये हाच एसओपी स्थापन करण्याचा उद्देश असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाHealthआरोग्यPune Crimeपुणे क्राईम बातम्या