शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

तानाजी सावंतांचा मुलगा विमानतळावरुन बेपत्ता; म्हणाले, "कमीत कमी १५ ते २० फोन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 20:33 IST

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते.

Tanaji Sawant Son Missing: माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरुन बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाची तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारात तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत (Rushiraj Sawant) हे एका स्विफ्ट गाडीत बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ऋषिराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. या सगळ्या प्रकारानंतर तानाजी सावंत यांनी थेट पोलीस आयुक्तांचे कार्यालया गाठलं. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

शिवसेनेचे विद्यमान आमदार पुणे तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पुणे विमानतळावरून ते बेपत्ता झाले. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी ४.५७ वाजता स्विफ्ट गाडीतून ते पुणे विमातळावर गेले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमलाही यासंदर्भात निनावी फोन आला. यानंतर तानाजी सावंत आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

"दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेलेले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली. त्यांची माहिती घेणे सुरू झाले असून ते पुण्यावरून विमानाने गेले आहेत. त्यांचे विमान कोणत्या दिशेने आणि कुठे चालले आहे याची माहिती गोळा केली जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. याबद्दल सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडे या संदर्भातील तपास सोपवण्यात आला आहे. त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत," अशी माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

"मुलगा बेपत्ता किंवा त्याचे अपहरण झाले आहे असं काहीही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी जवळपास जाणार असेल तरी मुलगा मी इथे जात आहे असं सांगतो. पण यावेळी ते तिघेजण दुसऱ्याच गाडीतून गेल्याने मी अस्वस्थ झालो. याबाबत त्याने कोणालाही माहिती सांगितलेली नाही. दिवसातून कमीत कमी १५ ते २० फोन एकमेकांना होतात आणि त्यात फोन आलेला नाही. हा अचानक एअरपोर्टवर कशाला गेला त्यामुळे मी अस्वस्थ झालो. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली. आता माहिती मिळत आहेत की ते  विमानाने बाहेर गेले आहेत पण ते कुठे उतरणार आहेत याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. मुलाला जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो माघारी आला आणि त्याने माहिती दिली की मी त्या तिघांना एअरपोर्टला सोडून आलो.  ते नेमके कुठे गेलेत हे काहीच माहिती नाही," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं. 

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतPuneपुणेPoliceपोलिसKidnappingअपहरण