शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तहानलेल्या तळजाई टेकडीला मिळणार हक्काचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:30 IST

ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर अडीच किमीच्या जलवाहिनीद्वारे आता प्रक्रिया केलेले पाणी आज पोहचले आहे. दररोज पाच लाख लिटर पाणी येथे मिळणार आहे. परिणामी आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार आहे.

ठळक मुद्देतळजाई टेकडीवरील झाडांना मिळणार जीवनदान टाकाऊ पाण्यामुळे टिकून राहणार तळजाईचे सौंदर्य

पुणे :  रणरणते ऊन आणि त्यामुळे शुष्क झालेली माती त्यामुळे वाळून जाणारी वनराई असे चित्र उन्हाळ्यात दिसून येते. त्यातच झाडे जर सार्वजनिक असतील तर त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घेण्यास शासकीय यंत्रणाही तितकासा उत्साह दाखवत नाहीत. अशा परिस्थितीत पाण्याचा पुनर्वापर करून पुण्यातील तळजाई टेकडी हिरवीगार होणार आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे तब्बल अडीच किलोमीटरची पाईपलाईन टाकून हजारो झाडे उन्हाळ्यातही बहरतील यात शंका नाही. 

  तळजाई टेकडीवर १०७ एकर क्षेत्रात वसुंधरा जैव वैविध्य उद्यान हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून साकारला जात आहे. आतापर्यंत  पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा उन्हाळ्यात वाळून जात असे. या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी ,प्राणी -पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते.  टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते मात्र आजपासून तिथे  कै. वसंतराव बागुल उद्यानात सुरु असणाऱ्या  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पात शुद्ध होऊन बाहेर येणारे पाणी पोचवले जाणार आहे. या प्रकल्पापासून  काही अंतर जवळ असणाऱ्या आणि उंचीवर असणाऱ्या तळजाई टेकडीला पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाणार आहे.मंगळवारी प्रथमच प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिनीतून तळजाई टेकडीवर  पोहचले. यावेळी या शुद्ध पाण्याचे जलपूजन करण्यात आले, याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी आबा बागुल यांनी माहिती दिली असून या पाण्यामुळे झाडांचे संरक्षण तर होणार आहेच पण जमिनीची धूपही रोखली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी ५० लाखांची पाईपलाईन टाकली असून प्रकल्प उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा खर्च आल्याचे सांगितले.  या ठिकाणी नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर येथे एक लाख चौरस फुटाचे क्रीडांगणही  पूर्णत्वास आले असून लवकरच सौरउर्जेवरील ३०० किलोवॅटचा आदर्शवत प्रकल्पही  कार्यान्वित होणार आहे. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणाही सुरु होणार आहे. अशी माहिती बागुल यांनी यावेळी दिली.  

टॅग्स :PuneपुणेTaljai Tekdiतळजाई टेकडीWaterपाणी